शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कुंपणाअभावी वन्यप्राण्यांची धाव लोकवस्तीकडे!

By admin | Updated: September 15, 2015 00:44 IST

व्याघ्र प्रकल्प : बिबटे, गवे अन् डुकरांच्या हल्ल्यात अनेकांचा गेला जीव

अरुण पवार ल्ल पाटण पाटण तालुक्याच्या माथ्यावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प उभा केलाय खरा; पण त्याला कुंपण नसल्यामुळे सांभाळण्यात येणाऱ्या वन्यप्राण्यांची धाव मानवीवस्तीपर्यंत येऊन पोहोचली आहे. दिवसाही प्राणी लोकवस्तीत शिरत आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांत प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर शेकडो नागरिक हल्ल्यात जखमी झाले आहेत. व्याघ्र प्रकल्प जरूर करा; पण तो वनजमिनीतच असावा, अभयारण्यातील प्राणी बफर झोनमधील गावांमध्ये घुसतात. लोकांवर हल्ले करतात. पिकांची नासधूस करतात. यावर विचार व्हायला हवा. पूर्वी जंगले होती. प्राणीही होते आणि जंगलाशेजारी गावेही होती. मात्र वन्यप्राण्यांचा त्रास नगण्य होता. आज पाटण तालुक्यातील कोयना, मोरणा, ढेबेवाडी विभागातील कसणी, निवी सातर, पांढरपाणी, हुंबरणे, काहीर, मळे-कोळणे, पांथरपुंज नाव, केमसे-नाणेल, बाजे, जिंती, वनकुसवडे आदी शेकडो दुर्गम गावे वन्यप्राण्यांच्या जाचातून सुटका व्हावी, यासाठी धडपडत आहेत. पांढरेपाणी येथे घरात घुसून दुभत्या गाईचे नरडे फोडणारा बिबट्या लोकांनी पाहिला आहे. गव्याने धडक मारल्याने मृत्यू झालेलाही पाहिला आहे. त्यांच्या मुलाने हेलपाटे घातले. ढिगभर कागदपत्रे गोळा केली. अधिकारी, पुढाऱ्यांच्या हातापाया पडले मग बापाच्या मृत्यूबद्दल पाच लाखांची मदत मिळाली. डोंगरकपारीत राहणारी जनता वन्यप्राण्यांच्या भीतीने जीव मुठीत घेऊन जगत आहे. रात्र झाली की घराबाहेर पडायचं नाही. सूर्योदय झाल्याशिवाय पाणवठ्यावर पाणी आणायला जायचं नाही, अशी स्थिती आहे. वाघ सांभाळताना येथे शेकडो वर्षे राहणारा माणूस वाचला पाहिजे, याचा विचार शासनाने करायला पाहिजे. केवळ इंटरनेटवर बघून कोअर, बफर आणि सेन्सिटिव्ह झोन ठरविला खरा; पण यामध्ये समाविष्ट केलेल्या गावांतील लोकांना वन्यप्राण्यांमुळे सोसाव्या लागणाऱ्या यातना जाणून घ्यावात, अशी मागणी बफर झोनमधील गावांमधून होत आहे.