शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
2
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
3
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
4
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
5
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
6
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
7
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
8
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
9
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
10
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
11
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
12
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
13
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे
14
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
15
Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
16
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
17
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
18
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
19
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
20
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान

कारखान्यांनी बिले थकविली तर वीज कशाला तोडता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस घातलेला आहे; परंतु कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. एफआरपी थकल्याने शेतकऱ्यांना वीज बिल ...

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस घातलेला आहे; परंतु कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. एफआरपी थकल्याने शेतकऱ्यांना वीज बिल भरता येत नाही आणि बिले थकविणाऱ्या कारखान्यांवर सरकारदेखील कारवाई करत नाही, मग वीज बिल थकले म्हणून शेतकऱ्यांची वीज का तोडता? असा सवाल रयत क्रांती संघटनेने उपस्थित केला असून, संबंधित कारखान्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चालू गळीत हंगामामध्ये कारखान्यांनी ऊस तोड करून नेलेल्या उसाची रक्कम एफआरपीच्या नियमाप्रमाणे १४ दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक होते; मात्र अनेक कारखान्यांनी ९० दिवस उलटून गेले तरीदेखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाहीत. जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास एफआरपी देण्याचे आश्वासन देऊन ऊसतोड करीत असतात. परंतु, जिल्ह्यातील काही कारखान्यांनी अद्यापही ऊस बिलाची रक्कम दिलेली नाही. येत्या चार दिवसांमध्ये किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर रयत क्रांती संघटना बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे. तसेच जिल्ह्यातील इतर कारखान्यांनीही एफआरपीची रक्कम न दिल्यास त्यांच्या कार्यस्थळावरही अशाच प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे.

तरी एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक असताना, कोरोनासारख्या महामारीमध्ये शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीचे वीज कनेक्शन तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळाली असती तर शेतकऱ्यांनी वीज महामंडळाचे बिल भरले असते; परंतु ती रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. रयत क्रांती संघटनेने जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन सादर केले आहे.

रयत क्रांती संघटनेचे राज्य सरचिटणीस शंकर शिंदे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.