शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांनी बिले थकविली तर वीज कशाला तोडता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस घातलेला आहे; परंतु कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. एफआरपी थकल्याने शेतकऱ्यांना वीज बिल ...

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस घातलेला आहे; परंतु कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. एफआरपी थकल्याने शेतकऱ्यांना वीज बिल भरता येत नाही आणि बिले थकविणाऱ्या कारखान्यांवर सरकारदेखील कारवाई करत नाही, मग वीज बिल थकले म्हणून शेतकऱ्यांची वीज का तोडता? असा सवाल रयत क्रांती संघटनेने उपस्थित केला असून, संबंधित कारखान्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चालू गळीत हंगामामध्ये कारखान्यांनी ऊस तोड करून नेलेल्या उसाची रक्कम एफआरपीच्या नियमाप्रमाणे १४ दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक होते; मात्र अनेक कारखान्यांनी ९० दिवस उलटून गेले तरीदेखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाहीत. जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास एफआरपी देण्याचे आश्वासन देऊन ऊसतोड करीत असतात. परंतु, जिल्ह्यातील काही कारखान्यांनी अद्यापही ऊस बिलाची रक्कम दिलेली नाही. येत्या चार दिवसांमध्ये किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर रयत क्रांती संघटना बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे. तसेच जिल्ह्यातील इतर कारखान्यांनीही एफआरपीची रक्कम न दिल्यास त्यांच्या कार्यस्थळावरही अशाच प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे.

तरी एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक असताना, कोरोनासारख्या महामारीमध्ये शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीचे वीज कनेक्शन तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळाली असती तर शेतकऱ्यांनी वीज महामंडळाचे बिल भरले असते; परंतु ती रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. रयत क्रांती संघटनेने जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन सादर केले आहे.

रयत क्रांती संघटनेचे राज्य सरचिटणीस शंकर शिंदे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.