शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कारखान्यांनी बिले थकविली तर वीज कशाला तोडता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस घातलेला आहे; परंतु कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. एफआरपी थकल्याने शेतकऱ्यांना वीज बिल ...

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस घातलेला आहे; परंतु कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. एफआरपी थकल्याने शेतकऱ्यांना वीज बिल भरता येत नाही आणि बिले थकविणाऱ्या कारखान्यांवर सरकारदेखील कारवाई करत नाही, मग वीज बिल थकले म्हणून शेतकऱ्यांची वीज का तोडता? असा सवाल रयत क्रांती संघटनेने उपस्थित केला असून, संबंधित कारखान्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चालू गळीत हंगामामध्ये कारखान्यांनी ऊस तोड करून नेलेल्या उसाची रक्कम एफआरपीच्या नियमाप्रमाणे १४ दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक होते; मात्र अनेक कारखान्यांनी ९० दिवस उलटून गेले तरीदेखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाहीत. जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास एफआरपी देण्याचे आश्वासन देऊन ऊसतोड करीत असतात. परंतु, जिल्ह्यातील काही कारखान्यांनी अद्यापही ऊस बिलाची रक्कम दिलेली नाही. येत्या चार दिवसांमध्ये किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर रयत क्रांती संघटना बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे. तसेच जिल्ह्यातील इतर कारखान्यांनीही एफआरपीची रक्कम न दिल्यास त्यांच्या कार्यस्थळावरही अशाच प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे.

तरी एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक असताना, कोरोनासारख्या महामारीमध्ये शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीचे वीज कनेक्शन तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळाली असती तर शेतकऱ्यांनी वीज महामंडळाचे बिल भरले असते; परंतु ती रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. रयत क्रांती संघटनेने जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन सादर केले आहे.

रयत क्रांती संघटनेचे राज्य सरचिटणीस शंकर शिंदे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.