शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर रेल्वे अद्याप ‘लाॅक’च का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:42 IST

जगदीश कोष्टी लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यातून रेल्वे एक्स्प्रेस थांबत असल्या, तरी त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना म्हणावा तेवढा ...

जगदीश कोष्टी

लाेकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यातून रेल्वे एक्स्प्रेस थांबत असल्या, तरी त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना म्हणावा तेवढा फायदा होत नाही. त्यामुळे पॅसेंजर कधी सुरू होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अजूनही पॅसेंजर सुरू केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे मंत्रालयाने दोन डोस घेतलेल्यांना एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यास मुभा देण्याची गरज आहे.

एक्स्प्रेस सुरूच

सातारा जिल्ह्यातून धावत असलेल्या एक्स्प्रेस गाड्या अनेक ठिकाणी थांबत असतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. पॅसेंजरबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.

- एक अधिकारी.

चौकट

चार पॅसेंजर सुरू केवळ रेल्वे कामगारांसाठी...

सातारा जिल्ह्यातून धावत असलेल्या कोल्हापूर-पुणे, सातारा-पुणे या गाड्या रात्री फिरत असायच्या. दरम्यानच्या काळात फलटण-पुणे या डेमू पॅसेंजर दिवसातून दोनवेळा धावत होती. त्या आता बंद आहेत. या पॅसेंजर सुरू आहेत. मात्र त्यामधून रेल्वे कामगारांनाच प्रवास करू दिला जात असतो. इतरांना बंदी आहे.

चौकट

रोज चार एक्स्प्रेस सुरू

सातारकरांसाठी सध्या दररोज धावणारी निझामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर छत्रपती शिवाजी टर्मिनस स्पेशल ट्रेन धावते. दर रविवारी गांधीधाम एक्स्प्रेस, दादर सेंट्रल स्पे., तर दर मंगळवार, शुक्रवार, शनिवारी दादर सेंट्रल चालुक्य एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र यांना जिल्ह्यात मोजकाच थांबा देण्यात आला आहे.

चौकट

महालक्ष्मी, सह्याद्री बंदच

पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सोयीच्या असणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस रेल्वे दुहेरीकरणामुळे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.

चौकट

शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मोठी गरज

सातारा जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादक पुण्याला कृषी माल घेऊन पॅसेंजरने जात असतात. स्वतंत्र गाडी करून माल घेऊन जाणे सर्वच शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे पॅसेंजर फायद्याची आहे. यामुळे रेल्वेलाही चांगले उत्पन्न मिळत असते. त्यामुळे पॅसेंजर सुरू करावी.

- प्रमोद जेधे, प्रवासी, सातारा.

रेल्वे प्रशासनाने मुंबईत दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातून शेतकरी, महाविद्यालयीन तरुणांना कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी पॅसेंजर सुरू करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यादृष्टीने विचार करायला हवा.

- राहुल उतेकर, सातारा