शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

पॅसेंजर रेल्वे अद्याप ‘लाॅक’च का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:42 IST

जगदीश कोष्टी लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यातून रेल्वे एक्स्प्रेस थांबत असल्या, तरी त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना म्हणावा तेवढा ...

जगदीश कोष्टी

लाेकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यातून रेल्वे एक्स्प्रेस थांबत असल्या, तरी त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना म्हणावा तेवढा फायदा होत नाही. त्यामुळे पॅसेंजर कधी सुरू होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अजूनही पॅसेंजर सुरू केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे मंत्रालयाने दोन डोस घेतलेल्यांना एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यास मुभा देण्याची गरज आहे.

एक्स्प्रेस सुरूच

सातारा जिल्ह्यातून धावत असलेल्या एक्स्प्रेस गाड्या अनेक ठिकाणी थांबत असतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. पॅसेंजरबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.

- एक अधिकारी.

चौकट

चार पॅसेंजर सुरू केवळ रेल्वे कामगारांसाठी...

सातारा जिल्ह्यातून धावत असलेल्या कोल्हापूर-पुणे, सातारा-पुणे या गाड्या रात्री फिरत असायच्या. दरम्यानच्या काळात फलटण-पुणे या डेमू पॅसेंजर दिवसातून दोनवेळा धावत होती. त्या आता बंद आहेत. या पॅसेंजर सुरू आहेत. मात्र त्यामधून रेल्वे कामगारांनाच प्रवास करू दिला जात असतो. इतरांना बंदी आहे.

चौकट

रोज चार एक्स्प्रेस सुरू

सातारकरांसाठी सध्या दररोज धावणारी निझामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर छत्रपती शिवाजी टर्मिनस स्पेशल ट्रेन धावते. दर रविवारी गांधीधाम एक्स्प्रेस, दादर सेंट्रल स्पे., तर दर मंगळवार, शुक्रवार, शनिवारी दादर सेंट्रल चालुक्य एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र यांना जिल्ह्यात मोजकाच थांबा देण्यात आला आहे.

चौकट

महालक्ष्मी, सह्याद्री बंदच

पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सोयीच्या असणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस रेल्वे दुहेरीकरणामुळे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.

चौकट

शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मोठी गरज

सातारा जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादक पुण्याला कृषी माल घेऊन पॅसेंजरने जात असतात. स्वतंत्र गाडी करून माल घेऊन जाणे सर्वच शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे पॅसेंजर फायद्याची आहे. यामुळे रेल्वेलाही चांगले उत्पन्न मिळत असते. त्यामुळे पॅसेंजर सुरू करावी.

- प्रमोद जेधे, प्रवासी, सातारा.

रेल्वे प्रशासनाने मुंबईत दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातून शेतकरी, महाविद्यालयीन तरुणांना कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी पॅसेंजर सुरू करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यादृष्टीने विचार करायला हवा.

- राहुल उतेकर, सातारा