शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

येऊन-येऊन येणार कोण? उद्या फैसला : सातारच्या खासदारकीबाबत रंगल्या पैजा

By admin | Updated: May 15, 2014 00:23 IST

सागर गुजर ल्ल सातारा सातार्‍यासह संपूर्ण देशात तब्बल नऊ टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या

सागर गुजर ल्ल सातारा सातार्‍यासह संपूर्ण देशात तब्बल नऊ टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास राहिले असताना उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जेवणापासून रोख रकमेपर्यंत पैजा लावल्या आहेत. काहींना तर विजयाची पक्की खात्री आहे; मात्र मताधिक्क्य नेमके किती असणार यावरून चुरशीच्या गप्पा सुरु असलेल्या पाहायला मिळतात. या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले, पुरुषोत्तम जाधव, राजेंद्र चोरगे, अ‍ॅड. वर्षा माडगूळकर, पांडुरंग शिंदे, अशोक गायकवाड या दिग्गजांसह कधी नव्हे ते १८ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे १९९६ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सातारा शहरासह जिल्ह्यात वर्तविली जात आहे. प्रत्येक उमेदवाराचे समर्थक आपल्या व्होट बँकेचे गणित करण्यात गुंतलेले पाहायला मिळतात. १८ उमेदवारांपैकी मोजके उमेदवार सोडले तर प्रत्येकाची वेगळी व्होट बँक जिल्ह्यात आहे. त्यामुळे कोणीही निवडून आले तरी अतिशय कमी मताधिक्क्य राहील, असा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत. दरम्यान, स्थानिक पातळीवरील नगरपालिका, ग्रामपंचायत, विकास सेवा सेवा सोसायट्या व पतसंस्थांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारांच्या जय-पराजयाच्याच गप्पा आता रंगू लागल्या आहेत. ‘पैज लावू सांगतो...कोण जिंकणार ते!’ यापासून ते ‘किती मताधिक्क्य मिळणार?’ यापर्यंत चर्चेला ऊत आला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे गावांतील झाडांच्या पाराखाली बसून जिल्ह्यापासून दिल्लीपर्यंत गप्पा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीला कुठे दगाफटका झाला व कुठे वाढ झाली, याचेही गणित मांडले जात आहे. वास्तविक, मतमोजणीनंतरच खरं गणित बाहेर येणार असलं तरीही कोरड्या गप्पा जागोजागी रंगलेल्या दिसतात. देशात काँगे्रसचीच सत्ता राहणार की मोदी सरकार बाजी मारणार, आम आदमी पार्टीचे भविष्य कसे राहील, याबाबत राजकारणाची आवड असणारी मंडळी चवीने चर्चा करत आहेत. सातारा शहरात सार्वजनिक वाचनालयांमध्ये राजकीय बातम्याच मोठ्या आवडीने वाचल्या जात आहेत. ‘एक्झिट पोल’ने दर्शविलेल्या अंदाजांचे दाखलेही काही जण देत आहेत. विजयी उमेदवार ४ लाखांची ‘लीड’ घेतील, असं आश्चर्यकारक भाकितही काहीजण वर्तवत आहेत. त्याउलट १0 ते ११ हजार मतांनीच खासदार निवडून येतील, असा उलटा अंदाजही व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तव्यात भाकरीच टाकली नसल्याचे राजकीय भाष्य करत सातारच्या जागेबाबत संदिग्धता निर्माण केली होती. उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी देण्यावरुन पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपला निर्णय काहीसा उशिरा जाहीर केला. उदयनराजेंनीही विविध पक्षांच्या प्रमुखांच्या गाठीभेटी घेऊन सर्वांनाच गाफील ठेवले. थोडक्यात काय, तर शरद पवारांचीच राजकीय खेळी यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा शहरासह कºहाड, पाटणमध्येही सुरु आहे. उदयनराजेंना मागील निवडणुकीत मिळालेले तीन लाखांचे मताधिक्य लक्षात घेऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनीही सातारची सुभेदारी आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्याकडे सोपविली. आरपीआयने सुरुवातीला संभाजी संकपाळ या मराठा उमेदवाराला पक्षात घेऊन बहुजन समाजाच्या एकीचा दिखावा केला; परंतु नंतर त्या उमेदवाराच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवून पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना उमेदवारी दिली. आम आदमी पार्टीचे उमेदवार राजेंद्र चोरगे हे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची तयारी करतील, अशी चर्चा असताना त्यांच्या खांद्यावर पक्षाने लोकसभेची निवडणूक लढविण्याची जबाबदारी दिली. त्यांनी सुरुवातीच्या काळात प्रचारात चांगलीच मुसंडी मारली होती. पुरुषोत्तम जाधवांना पक्षाने डावलल्यानंतर त्यांनी जोरदार प्रचार केला. वाईच्या ‘होम पीच’सह कºहाड-पाटण तालुक्यांत त्यांनी झंझावाती प्रचार केला. आता मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदानयंत्रांमधील वास्तव आणि ही उत्सुकता यांच्यात आता अंतर राहिले आहे फक्त २४ तासांचे!