शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

येऊन-येऊन येणार कोण? उद्या फैसला : सातारच्या खासदारकीबाबत रंगल्या पैजा

By admin | Updated: May 15, 2014 00:23 IST

सागर गुजर ल्ल सातारा सातार्‍यासह संपूर्ण देशात तब्बल नऊ टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या

सागर गुजर ल्ल सातारा सातार्‍यासह संपूर्ण देशात तब्बल नऊ टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास राहिले असताना उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जेवणापासून रोख रकमेपर्यंत पैजा लावल्या आहेत. काहींना तर विजयाची पक्की खात्री आहे; मात्र मताधिक्क्य नेमके किती असणार यावरून चुरशीच्या गप्पा सुरु असलेल्या पाहायला मिळतात. या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले, पुरुषोत्तम जाधव, राजेंद्र चोरगे, अ‍ॅड. वर्षा माडगूळकर, पांडुरंग शिंदे, अशोक गायकवाड या दिग्गजांसह कधी नव्हे ते १८ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे १९९६ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सातारा शहरासह जिल्ह्यात वर्तविली जात आहे. प्रत्येक उमेदवाराचे समर्थक आपल्या व्होट बँकेचे गणित करण्यात गुंतलेले पाहायला मिळतात. १८ उमेदवारांपैकी मोजके उमेदवार सोडले तर प्रत्येकाची वेगळी व्होट बँक जिल्ह्यात आहे. त्यामुळे कोणीही निवडून आले तरी अतिशय कमी मताधिक्क्य राहील, असा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत. दरम्यान, स्थानिक पातळीवरील नगरपालिका, ग्रामपंचायत, विकास सेवा सेवा सोसायट्या व पतसंस्थांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारांच्या जय-पराजयाच्याच गप्पा आता रंगू लागल्या आहेत. ‘पैज लावू सांगतो...कोण जिंकणार ते!’ यापासून ते ‘किती मताधिक्क्य मिळणार?’ यापर्यंत चर्चेला ऊत आला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे गावांतील झाडांच्या पाराखाली बसून जिल्ह्यापासून दिल्लीपर्यंत गप्पा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीला कुठे दगाफटका झाला व कुठे वाढ झाली, याचेही गणित मांडले जात आहे. वास्तविक, मतमोजणीनंतरच खरं गणित बाहेर येणार असलं तरीही कोरड्या गप्पा जागोजागी रंगलेल्या दिसतात. देशात काँगे्रसचीच सत्ता राहणार की मोदी सरकार बाजी मारणार, आम आदमी पार्टीचे भविष्य कसे राहील, याबाबत राजकारणाची आवड असणारी मंडळी चवीने चर्चा करत आहेत. सातारा शहरात सार्वजनिक वाचनालयांमध्ये राजकीय बातम्याच मोठ्या आवडीने वाचल्या जात आहेत. ‘एक्झिट पोल’ने दर्शविलेल्या अंदाजांचे दाखलेही काही जण देत आहेत. विजयी उमेदवार ४ लाखांची ‘लीड’ घेतील, असं आश्चर्यकारक भाकितही काहीजण वर्तवत आहेत. त्याउलट १0 ते ११ हजार मतांनीच खासदार निवडून येतील, असा उलटा अंदाजही व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तव्यात भाकरीच टाकली नसल्याचे राजकीय भाष्य करत सातारच्या जागेबाबत संदिग्धता निर्माण केली होती. उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी देण्यावरुन पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपला निर्णय काहीसा उशिरा जाहीर केला. उदयनराजेंनीही विविध पक्षांच्या प्रमुखांच्या गाठीभेटी घेऊन सर्वांनाच गाफील ठेवले. थोडक्यात काय, तर शरद पवारांचीच राजकीय खेळी यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा शहरासह कºहाड, पाटणमध्येही सुरु आहे. उदयनराजेंना मागील निवडणुकीत मिळालेले तीन लाखांचे मताधिक्य लक्षात घेऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनीही सातारची सुभेदारी आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्याकडे सोपविली. आरपीआयने सुरुवातीला संभाजी संकपाळ या मराठा उमेदवाराला पक्षात घेऊन बहुजन समाजाच्या एकीचा दिखावा केला; परंतु नंतर त्या उमेदवाराच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवून पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना उमेदवारी दिली. आम आदमी पार्टीचे उमेदवार राजेंद्र चोरगे हे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची तयारी करतील, अशी चर्चा असताना त्यांच्या खांद्यावर पक्षाने लोकसभेची निवडणूक लढविण्याची जबाबदारी दिली. त्यांनी सुरुवातीच्या काळात प्रचारात चांगलीच मुसंडी मारली होती. पुरुषोत्तम जाधवांना पक्षाने डावलल्यानंतर त्यांनी जोरदार प्रचार केला. वाईच्या ‘होम पीच’सह कºहाड-पाटण तालुक्यांत त्यांनी झंझावाती प्रचार केला. आता मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदानयंत्रांमधील वास्तव आणि ही उत्सुकता यांच्यात आता अंतर राहिले आहे फक्त २४ तासांचे!