शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
4
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
5
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
6
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
7
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
8
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
9
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
10
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
11
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
12
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
13
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
14
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
15
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
17
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
18
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
19
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
20
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील दहा हजार दंडाचा कोण होणार मानकरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाची महामारी आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची महामारी आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. यामध्ये अत्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा निर्बंध तो म्हणजे दहा हजार रुपये दंड. लाॅकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना तब्बल दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. हा दंड ऐकूनच अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यात मंगळवारपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, दोन दिवसांत पोलिसांनी एकाही व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड केला नाही. त्याचे कारण म्हणजे पोलीस सहानुभूतीने विचार करीत आहेत. जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली जाहीर केली. या नियमावलीमध्ये पहिल्यांदाच दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. एरवी दोनशे ते पाचशे रुपये दंड जाहीर करण्यात आला होता. मात्र, ही रक्कमही मोठी असल्याने अनेकांकडून शंभर रुपये दंड घेतला जात होता. गतवर्षी सुरुवातीच्या कोरोनाच्या महामारीमध्ये पाचशे रुपये दंड काही दिवस आकारला गेला. मात्र, प्रशासनाने हा निर्णय लेखी मागे न घेता अधिकाऱ्यांना तोंडी सूचना देऊन पाचशे रुपये दंड घेऊ नका, १०० ते २०० रुपये दंड आकारा, अशा सूचना दिल्या. आता तर दहा हजार रुपये दंड जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या दहा हजार रुपये दंडाचा जिल्ह्यात पहिला मानकरी कोण होतोय, याची उत्सुकता आता नागरिकांना लागून राहिली आहे. सध्या कडक लाॅकडाऊन असला तरी अनेकजण अत्यावश्यक सेवेचे कारण सांगून घराबाहेर पडत आहेत. काहींचे हॉस्पिटलचे कारण असते. त्यामुळे पोलीस अशा व्यक्तीवर दोनशे रुपये दंड आकारून त्यांना समज देत आहेत. हा दहा हजार रुपयांचा दंड सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीमुळे लोक पिचलेले आहेत. आर्थिक संकटात सापडलेले आहेत. अनेकांच्या नोकऱ्यासुद्धा गेल्या आहेत, याचा विचार पोलिसांकडून सध्या केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

चौकट:

पोलीस देताहेत नियम पाळण्याचे संदेश

सध्या कडक लॉकडाऊन असला तरी पोलिसांकडून गुन्हे दाखल करून नियम पाळण्याचा संदेश दिला जात आहे. दहा हजार रुपये दंड करणे हे अन्यायकारक ठरेल, असे पोलीस खासगीमध्ये बोलून दाखवत आहेत. नागरिकांना एवढ्या मोठ्या रकमेचा दंड परवडणारा नाही, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.