शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मनोमिलनाचं घोडे कुठे अडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. सध्या कारखान्याची सत्ता ...

अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. सध्या कारखान्याची सत्ता भाजपवासी असलेल्या डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनलकडे आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी त्यांचेच पारंपरिक विरोधक असलेल्या डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाचे प्रयत्न युद्धपातळीवर झाले.

कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते हे काँग्रेस विचाराचे पाईक आहेत, तर दुसरे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा गाडा हाकला जात आहे. त्यामुळे तोच पॅटर्न कारखाना निवडणुकीत राबविण्याच्या इराद्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, ॲड. उदयसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला. चार महिन्यांत अनेक बैठका झाल्या. त्यात बऱ्याच चर्चा झाल्या. लवकरच ‘गुड न्यूज’ मिळेल, असेही कार्यकर्ते खात्रीशीर सांगत होते; पण अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी या चर्चांमधून रस बाहेर पडला नाही, हे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतच मी कृष्णाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी खूप प्रयत्न केले; पण त्याला यश आले नाही. त्यामुळे मी या चर्चेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. तेव्हा, राज्यात तीन पक्षांचे सरकार तुम्ही आणू शकता, मग इथे दोघांना एकत्र आणायला काय अडचण आली. नेमके घोडे कुठे अडतेय, असे विचारले. मात्र, त्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी बोलणे टाळले. त्यामुळे मनोमिलन प्रक्रिया थांबली, असा संदेश सर्वत्र गेला.

त्यानंतर काही दिवसांनी पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांची मुंबईत भेट झाली. या भेटीत कृष्णावरही चर्चा झाली. त्यामुळे मोहितेंच्या मनोमिलनाच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली; पण जपून शब्द टाकणाऱ्या थोरल्या पवारांनी इथे शब्द खर्च केला का? हा संशोधनाचा भाग आहे. त्यामुळे गुरुवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी तिरंगी लढत स्पष्ट झाली.

गुरुवारी रयत पॅनलच्या वतीने एक पत्रकार परिषद झाली. त्यात मंत्री विश्वजित कदम यांनाही माध्यमांच्या प्रतिनिधींनी मनोमिलन प्रक्रियेत नेमकी काय अडचण आली? नेमका काय प्रस्ताव होता? याबाबत विचारले. त्यावेळी मनोमिलन होऊ शकले नाही. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. एवढेच त्यांनी सांगितले; पण प्रस्ताव काय होता? यावर बोलणे खुबीने टाळले, तर इंद्रजित मोहिते यांनी या प्रश्नाकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे मनोमिलन नेमके का होऊ शकले नाही, याबाबत सभासद कार्यकर्त्यांची उत्सुकता कायम आहे. आता अविनाश मोहिते या प्रश्नांची काय उत्तरे देणार, हे पाहावे लागेल.

दरम्यान, कार्यकर्त्यांत मात्र याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोणी म्हणे पहिला अध्यक्ष कोणी व्हायचे यावरून एकमत झाले नाही, तर काही जण म्हणतात, जागावाटपावरून दोघांचे जमले नाही; पण या चर्चा म्हणजे ‘वाऱ्यावरची वरात’ आहे. नेमके मनोमिलन का झाले नाही, हे दोन माजी अध्यक्ष माहितेंना व त्यासाठी प्रमुख मध्यस्थी करणाऱ्यांनाच माहीत. ते यावर काहीच बोलायला तयार नाहीत; पण मनोमिलनाचे घोडे नेमके कुठे अडले याबाबतच्या चर्चा निवडणूक होईतोपर्यंत उलटसुलट अन्‌ चवीने चघळल्या जाणार, हे मात्र निश्चित!

-प्रमोद सुकरे, कराड