शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मनोमिलनाचं घोडे कुठे अडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. सध्या कारखान्याची सत्ता ...

अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. सध्या कारखान्याची सत्ता भाजपवासी असलेल्या डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनलकडे आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी त्यांचेच पारंपरिक विरोधक असलेल्या डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाचे प्रयत्न युद्धपातळीवर झाले.

कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते हे काँग्रेस विचाराचे पाईक आहेत, तर दुसरे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा गाडा हाकला जात आहे. त्यामुळे तोच पॅटर्न कारखाना निवडणुकीत राबविण्याच्या इराद्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, ॲड. उदयसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला. चार महिन्यांत अनेक बैठका झाल्या. त्यात बऱ्याच चर्चा झाल्या. लवकरच ‘गुड न्यूज’ मिळेल, असेही कार्यकर्ते खात्रीशीर सांगत होते; पण अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी या चर्चांमधून रस बाहेर पडला नाही, हे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतच मी कृष्णाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी खूप प्रयत्न केले; पण त्याला यश आले नाही. त्यामुळे मी या चर्चेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. तेव्हा, राज्यात तीन पक्षांचे सरकार तुम्ही आणू शकता, मग इथे दोघांना एकत्र आणायला काय अडचण आली. नेमके घोडे कुठे अडतेय, असे विचारले. मात्र, त्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी बोलणे टाळले. त्यामुळे मनोमिलन प्रक्रिया थांबली, असा संदेश सर्वत्र गेला.

त्यानंतर काही दिवसांनी पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांची मुंबईत भेट झाली. या भेटीत कृष्णावरही चर्चा झाली. त्यामुळे मोहितेंच्या मनोमिलनाच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली; पण जपून शब्द टाकणाऱ्या थोरल्या पवारांनी इथे शब्द खर्च केला का? हा संशोधनाचा भाग आहे. त्यामुळे गुरुवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी तिरंगी लढत स्पष्ट झाली.

गुरुवारी रयत पॅनलच्या वतीने एक पत्रकार परिषद झाली. त्यात मंत्री विश्वजित कदम यांनाही माध्यमांच्या प्रतिनिधींनी मनोमिलन प्रक्रियेत नेमकी काय अडचण आली? नेमका काय प्रस्ताव होता? याबाबत विचारले. त्यावेळी मनोमिलन होऊ शकले नाही. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. एवढेच त्यांनी सांगितले; पण प्रस्ताव काय होता? यावर बोलणे खुबीने टाळले, तर इंद्रजित मोहिते यांनी या प्रश्नाकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे मनोमिलन नेमके का होऊ शकले नाही, याबाबत सभासद कार्यकर्त्यांची उत्सुकता कायम आहे. आता अविनाश मोहिते या प्रश्नांची काय उत्तरे देणार, हे पाहावे लागेल.

दरम्यान, कार्यकर्त्यांत मात्र याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोणी म्हणे पहिला अध्यक्ष कोणी व्हायचे यावरून एकमत झाले नाही, तर काही जण म्हणतात, जागावाटपावरून दोघांचे जमले नाही; पण या चर्चा म्हणजे ‘वाऱ्यावरची वरात’ आहे. नेमके मनोमिलन का झाले नाही, हे दोन माजी अध्यक्ष माहितेंना व त्यासाठी प्रमुख मध्यस्थी करणाऱ्यांनाच माहीत. ते यावर काहीच बोलायला तयार नाहीत; पण मनोमिलनाचे घोडे नेमके कुठे अडले याबाबतच्या चर्चा निवडणूक होईतोपर्यंत उलटसुलट अन्‌ चवीने चघळल्या जाणार, हे मात्र निश्चित!

-प्रमोद सुकरे, कराड