शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विहिरींना भरपाई कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST

कऱ्हाड : गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कऱ्हाड दक्षिण विभागातील १०० हून अधिक विहिरींची मोठी पडझड झाली आहे. विहिरी ...

कऱ्हाड : गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कऱ्हाड दक्षिण विभागातील १०० हून अधिक विहिरींची मोठी पडझड झाली आहे. विहिरी गाळाने पूर्ण भरल्या असून, वीजपंप व पाणी उपसण्यासाठी लावलेल्या पाईप काही ठिकाणी वाहून गेल्या आहेत. अशा अवस्थेत असलेल्या विहिरींच्या डागडुजी तातडीने होणे गरजेचे आहे तरच शेतीला पाणी मिळू शकेल, यासाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

मागील महिन्यात दक्षिण मांड नदीला आलेल्या महापुरामुळे व परिसरात ढगफुटी झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नदीकाठच्या तसेच शेतशिवारातील अनेक विहिरींना याचा फटका बसला आहे. अनेकांच्या बंदिस्त असलेल्या विहिरी पडून गाळाने भरल्या आहेत; तर अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्ण काठोकाठ मुरूम व गाळाच्या मातीने मुजवून गेल्या आहेत. विहिरीवरील पाणी उपसण्यासाठी जोडलेले वीजपंप पाण्याने वाहून गेले आहेत, तर पाणी उपसण्यासाठी लावलेल्या पाईप तुटून पडल्या असून, काही वाहून गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

दक्षिण मांड नदीला जोडणाऱ्या गोटेवाडी, येळगाव, येणपे, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येवती, शेळकेवाडी, उंडाळे, महारुगडेवाडी, जिंती, साळशिरंबे, मनव, नांदगाव, काले पायणी, पाटील मळा, काले, जुजारवाडी, वाठार, चपणेमळी, धोंडेवाडी, महादेव मंदिर परिसर, भैरवनाथ नगर, आदी परिसरातील १०० हून अधिक शेतकऱ्यांच्या विहिरी जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने सरासरी लाखोंचे नुकसान झाले आहे. विहिरींची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

पावसाने विश्रांती घेऊन महिना उलटला आहे. प्रत्येक गावातील विहीर तसेच शेतीचे नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, जलसंधारण विभाग यांच्यामार्फत झाले आहेत; तर काही ठिकाणी कोणताच अधिकारी शेतकऱ्यांचे नुकसान पाहावयास आलेला नाही. असेही अनेक गावांत झाले आहे. शासकीय करपात्र विहिरींना शासन पातळीवर भरपाई दिली जाते. मात्र खासगी नुकसान झालेल्या विहिरींनी अपवादात्मक भरपाई मिळते. नुकसानीचा डाटा शासनाकडे सादर केला आहे. मात्र, नुकसानभरपाईचा कोणताच आदेश शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान मिळेल की नाही, हे रामभरोसे आहे. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटातून शेतकरी कसेबसे सावरत आहेत, तोच अतिवृष्टीमुळे पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मदत देऊ करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत.

(चौकट)

पाईपलाईनचा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर...

अतिवृष्टीमुळे विहिरीचे झालेले नुकसानीचे पंचनामे शासकीय अधिकाऱ्यांनी केले आहेत. त्यातून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. नव्याने विहीर खुदाई करताना प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी पाच लाखांहून अधिक खर्च येत असतो. मात्र, अनेकांच्या विहिरी पूर्ण काठोकाठ मुजल्या आहेत. त्यातील गाळ काढणे अशक्य आहे. वीजपंप व पाईपलाईन याचाही खर्च शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर आहे. शासकीय तुटपुंजी मदत शेतकऱ्याला पुन्हा उभारी देणारी ठरावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

फोटो

पाटीलमळा (ता. कऱ्हाड) येथे अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांची विहीर गाळाने भरून नुकसान झाले आहे.