शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

फलटणच्या पश्चिम भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीजपुरवठा सातत्याने खंडित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने व्यापारी, दुकानदार व शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज कंपनीने याबाबत तातडीने उपायोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

सुमारे साठ वर्षांपासून हिंगणगावला (ता . फलटण) लोणंद फिडरवरून वीजपुुरवठा केला जात आहे. गेल्या काही वर्षांत विद्युत खांब, विद्युत तारा जीर्ण झाल्यामुळे तुटण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. हिंगणगाव पटट्यात बागायती गावे असल्याने पन्नासच्या आसपास कृषी ट्रान्सफाॅर्मर आहेत. त्यावर शेकडो शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरुन कृषी पंपासाठी वीज जोडणी घेतली आहे. यावर्षी पाऊस व पाणीसाठा चांगला असल्याने बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु, वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने विहिरींना पाणी असूनही पिकांना देता येत नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

हिंगणगावची लोकसंख्या पाच हजाराहून अधिक आहे. गावात किराणा दुकान, पीठ गिरणी, दूध डेअरी, कृषी उद्योग, बॅंका, पतसंस्था, सोसायट्या आहेत. या सर्वांना वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आर्थिक झळही सोसावी लागत आहे. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

(कोट)

उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा हिंगणगावची वीज कधी गायब होईल, हे सांगता येत नाही. वांरवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शिवाय आर्थिक नुकसानही होत आहे.

- संजय घोरपडे, व्यावसायिक, हिंगणगाव

फोटो : वीजपुरवठा (क्लिपआर्ट)