शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास... पॅनेलप्रमुख नव्हे, मतदारच देणार जाहीरनामा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST

कोपर्डे हवेली : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदारांपुढे पॅनेलच्या माध्यमातून गावाचा विकास कसा करणार, याचा जाहीरनामा मांडला ...

कोपर्डे हवेली : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदारांपुढे पॅनेलच्या माध्यमातून गावाचा विकास कसा करणार, याचा जाहीरनामा मांडला जात आहे. मात्र, कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील काही युवकांनी ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून गावातील प्रश्नांसंदर्भात ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेऊन दोन्ही गटांच्या उमेदवारांपुढे जनतेचा जाहीरनामा मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

कोपर्डे हवेली ही या जिल्हा परिषद गटातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून पाच प्रभागांत १५ सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी दोन्ही गटांनी गत दोन महिन्यांपासून निवडणुकीची तयारी केली असून, या ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. काही प्रभागांत ‘काँटे की टक्कर’ होणार आहे. दोन्ही गटांनी तुल्यबळ असे उमेदवार देऊन ‘हम भी कम नहीं’ असेच वातावरण तयार केले आहे. दोन्ही गटांचा विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्यापूर्वीच गावातील काही युवकांनी ‘गुगल’चा आधार घेऊन ऑनलाईन फॉर्मवर गावाचे प्रश्न मांडून त्यावर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया मागविल्या आहेत. येणाऱ्या प्रतिक्रिया दोन्ही गटांच्या पॅनेलप्रमुख आणि उमेदवारांना देण्यात येणार आहेत.

जनतेच्या जाहीरनाम्यात कचरागाडी, प्रत्येक प्रभागात छोटे मैदान, गावातील अतिक्रमणे, व्यावसायिक गाळ्याची निर्मिती, मोठे आरोग्य केंद्र, बंदिस्त गटारे, कचऱ्याची विल्हेवाट, शेती प्रशिक्षण, सरकारी सुविधा मार्गदर्शन, सांडपाणी व्यवस्थापन, आदींसह इतर प्रश्न विचारले असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्या प्रतिक्रिया दोन्ही गटांच्या पॅनेलप्रमुख आणि उमेदवारांना देण्यात येणार आहेत. गेल्या अनेक निवडणुकीत प्रत्येक पॅनेल पाच वर्षांसाठी आपले जाहीरनामे ग्रामस्थांपुढे मांडत होते; पण जनतेच्या अपेक्षांचा विचार आता दोन्ही गटांना करावा लागणार आहे.

- चौकट

मतदार जागृत; उमेदवारांना राहावे लागणार सतर्क

सत्ताधारी सिद्धेश्वर पॅनेल आणि विरोधकांचे हनुमान पॅनेल यांच्यात दुरंगी लढत होणार असून, जनतेच्या जाहीरनाम्यामुळे दोन्ही गटांना या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे. मतदार जागृत असल्याचे यामुळे दिसून येत असून पूर्वीच्या तुलनेत निवडून येणाऱ्या उमेदवारांना विकासकामांसाठी सतर्क राहावे लागणार आहे.