शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

लोकसंख्या नोंदणीचा भुंगा आता ‘माध्यमिक’च्या मागे!

By admin | Updated: October 25, 2015 00:03 IST

प्रशिक्षण झाले सुरू : अशैक्षणिक कामाबाबत मुख्याध्यापक संघ मागणार न्यायालयात दाद

सातारा : राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरण कामावर बहिष्कार टाकून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ही कामे प्राथमिक शिक्षकांवर बधनकारक करू नये, त्यांनी अशी कामे करण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाई करू नये, अशा प्रकारचा आदेश दिला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक त्यातून सुटले खरे; पण आता लोकसंख्या नोंदणीचा भुंगा माध्यमिक शिक्षकांच्या पाठीमागे लागला आहे. आठ दिवसांपासून या कामाच्या आॅर्डर माध्यमिक शाळांना दिल्या जात असून त्याचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे. ‘आरटीई’ कायद्याअंतर्गत शिक्षकांना शाळेत थांबणे बंधनकारक आहे. ज्ञानदानात अडथळा ठरतील, अशी कामे शिक्षकांवर लादू नयेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांवर सोपविलेली लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाची जबाबदारी त्यांनी नाकारल्यामुळे हे ओझं आता माध्यमिक शिक्षकांच्या डोक्यावर दिले आहे. जास्तीत जास्त शिक्षकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे चार-पाच शिक्षक एकावेळी प्रशिक्षणासाठी जात आहेत. शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादल्याने त्याचा अध्यापनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण, असा सवाल माध्यमिक शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)  

उद्या गुरुजींची बैठक शासन निर्णयामुळे शाळांवर होणारे गंभीर परिणाम याबाबत सखोल चर्चा करण्यासाठी सोमवार, दि. २६ रोजी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची सहविचार सभा होणार आहे. मुख्याध्यापक भवन येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या सभेस राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष अरुणराव थोरात, सचिव विजयराव गायकवाड, माजी अध्यक्ष सुभाषराव माने उपस्थित राहणार आहेत.  

‘आरटीआई’ कायद्याअंतर्गत लोकसंख्या नोंदीचे काम प्राथमिक शिक्षकांनी नाकारले; ते काम आता माध्यमिक शिक्षकांच्या माथी मारले जात आहे. शिक्षकांना प्रक्षिणासाठी बोलाविले आहे. हे शाळाबाह्य काम अन्यायकारक असून ते न थाबविल्यास न्यायालयात दाद मागणार आहे. - संजय यादव, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ