शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘लग्न तुळशी’चं... ‘गोडधोड’ मुक्या प्राण्यांना!

By admin | Updated: November 25, 2015 00:37 IST

कऱ्हाडात अनोखा उपक्रम : सोहळ्यातला ऊस दुष्काळग्रस्त जनावरांसाठी

  कऱ्हाड : जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने दडी मारल्याने गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतीसह जनावरांची अवस्थाही चाऱ्याअभावी बिकट बनली आहे. त्यात अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शासनाकडूनही काही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या संकल्पनेतून कऱ्हाड येथे तुळशी विवाहासाठी वापरला गेलेला ऊस हा एकत्रित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मंगळवारी विक्रम पावसकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. चार ते पाच टेम्पोच्या माध्यमातून तालुक्यातील सुपने, साकुर्डी, शेरे, दुशेरे, राजमाची अशा ग्रामीण भागातून सोहळ्याचा ऊस घरोघरी जाऊन एकत्र करून तो दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी पाठविण्यात येणार आहे. यासाठी बुधवारपासून संपूर्ण तालुक्यात हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. गुरूवार, दि. २६ रोजी संपूर्ण तालुक्यातून तुळशी विवाहासाठी वापरलेला ऊस एकत्र करून तो दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी पाठविला जाणार आहे. तुळशी विवाहासाठी आणलेला ऊस हा नंतर लोकांकडून फेकून दिला जातो. त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही. तुळशी विवाहाच्या दिवशी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ऊस तोडला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हातातोंडाशी आलेला ऊस अशा धार्मिक कार्यासाठी तोडला जातो. इतकेच की काय शहरात तर या उसाची तुळशी विवाहा दिवशी मोठ्या प्रमाणात विक्रीही केली जाते. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी उसतोड करून नुकसान करण्यापेक्षा जनावरांना अन्न दिल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकेल. दुष्काळग्रस्त भागात सध्या पाण्याचा तसेच चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून ऊसदान हा उपक्रम राबविला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांना थोड्या प्रमाणात का होईना चारा मिळणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. (प्रतिनिधी) हिंदू एकताच्या उपक्रमास ‘कऱ्हाडकरांचा’ प्रतिसाद दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून तुळसी विवाहाचा ऊस हा देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी मंगळवारी कऱ्हाड शहरातून ऊस एकत्र करण्यात आला. या उपक्रमास कऱ्हाडकरांनीही चांगला प्रतिसाद दिला. घरगुती महिलांनी तुळशी विवाहासाठी आणलेला ऊस हिंदू एकताच्या वतीने आणलेल्या टेम्पोमध्ये स्वत: आणून दिला. हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतो. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता खटाव तालुक्यातील जनावरांसाठी तुळशी विवाहासाठी वापरण्यात आलेले ऊस गोळा करून तो पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याला कऱ्हाडसह तालुक्यातील अनेक गावच्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. - विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन, कऱ्हाड