शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

गारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

वाठार स्टेशन : उत्तर कोरेगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भांडवली खर्च असलेली पिके पूर्णपणे ...

वाठार स्टेशन : उत्तर कोरेगाव तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भांडवली खर्च असलेली पिके पूर्णपणे वाया गेली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार दीपक चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना दिले.

बुधवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने कलिंगड, गोट कांदा, ऊस, मिरची, भुईमूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आमदार चव्हाण आले होते. यावेळी कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, नागेश जाधव, पिंपोडे बुद्रुकचे सरपंच नैनेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, मंडल अधिकारी उमेश डोईफोडे उपस्थित होते.

गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल, यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी सरकार दरबारी आवश्यक असलेली सर्व मदत मी स्वतः तातडीने करेन, अशी ग्वाही चव्हाण यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी तलाठी सुहास सोनावणे, शिवाजी निकम, अशोक निकम, माजी सरपंच मच्छिंद्र केंजळे यांच्यासह अनेक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. गारपिटीने झालेले नुकसान खूप मोठे आहे. शेतात अर्धा ते पाऊण फूट गारांचा थर साठला होता. त्यामुळे पिकं अक्षरशः नासून गेली आहेत. गारपीट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत अनेक ठिकाणच्या गारा विरघळलेल्या नव्हत्या, यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. गोट कांद्याच्या फुलांचा जमिनीवर खच पडला होता. तर ऊस पिकाच्या पानाच्या चिंध्या झाल्या आहेत.

निसर्गाचे हे तांडव शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. लाखो रुपयांचा केलेला खर्च मातीमोल झाल्याने अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. सरकारने भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. आमदार चव्हाण यांनी पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडीसह परिसरात पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक, तलाठी व शेतकरी उपस्थित होते.