शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मातेनेच बुडविले पोटच्या गोळ्याला पाण्यात

By admin | Updated: September 9, 2014 23:45 IST

विडणीतील अपहरण प्रकरणाचा छडा : दीराच्या लग्नात अडथळा टाळण्यासाठी केले कृत्य

फलटण : विडणी (ता. फलटण) येथील अपहृत बाळाचा आईनेच पाण्याच्या टाकीत बुडवून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आंतरजातीय विवाह झाल्याने दिराचे लग्न होण्यात अडथळा येईल, या मानसिकतेतूनच तिने बाळाला मारून टाकले. यामुळे ‘आई न तू जात वैरिणी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विडणी येथील सुप्रिया अमित मोरे (वय २०, रा. जंक्शन, वालचंदनगर, ता. इंदापूर, हल्ली रा. चिंचवड, पुणे) यांचा मुलगा रुद्र (वय एक महिना सहा दिवस) याचे शनिवारी (दि. ६) दुपारी सव्वादोनच्या सुमारास अपहरण झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी गावात ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविली, मात्र बालक सापडले नव्हते. गावात ज्यांना मूलबाळ नाही, अशांकडेही चौकशी केली होती. त्यामुळे लोक भयभीत झाले होते. त्याच रात्री अकराच्या सुमारास घराजवळील स्वच्छतागृहाजवळील पाण्याच्या टाकीत रुद्रचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुप्रिया मोरे, तिचे आई-वडील आणि भावाला ताब्यात घेतले होते. चौकशीअंती सुप्रिया हिने स्वत:च्याच मुलाला पाण्यात बुडवून मारल्याचे सांगितले. गर्भपाताचाही केला होता प्रयत्नअमित व सुप्रिया यांनी पाच महिन्यांपूर्वी पुण्यात गर्भपात करण्याचाही निर्णय घेतला, मात्र डॉक्टरांनी नकार दिल्याने बाळंतपणासाठी ती माहेरी विडणी येथे आली होती. मोठ्या दिराच्या लग्नाला अडथळा येईल, त्यामुळे मूलच जिवंत ठेवले नाही तर आपले सर्व प्रश्न मिटतील व सासू-सासरेही चांगली वागणूक देतील, असा विचार करीत शनिवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घरात कोणी नसताना तिने घराबाहेरील पाण्याच्या टाकीत रुद्रला टाकले. नंतर बाळाचे अपहरण झाल्याचा कांगावा तिने केला.