शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जलयुक्त शिवार यशस्वी करू : गोरे

By admin | Updated: January 30, 2015 23:15 IST

लोकसहभागाशिवाय कामे गतीने होणार नाहीत, तरी विविध सामाजिक संघटना व इतर संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’

 म्हसवड : ‘जलयुक्त शिवार अभियानामध्ये प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सहभागी व्हावे. लोकसहभागातूनच हे अभियान यशस्वी होणार असून, या अभियानाच्या संधीतून जनतेने आपल्या गावात अधिकाधिक जलसंधारणाची कामे हाती घेऊन संपूर्ण तालुका टंचाईमुक्त करण्यासाठी सज्ज व्हावे,’ असे आवाहन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.राज्य शासनाच्या वतीने ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त राज्य’ करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द, पळशी, परकंदी, कुळकजाई, तोंडले, मोगराळे, इंजबाव, संभूखेड व पर्यंती या गावातील विविध कामांचा प्रारंभ आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर, उपसभापती अतुल जाधव, पंचायत समिती सदस्य दादासाहेब हुलगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला म्हणाले, ‘दुष्काळी माण व खटाव तालुका अशी ओळख असणाऱ्या दोन्ही तालुक्यांना लागलेला दुष्काळी कलंक पुसण्यासाठी व या भागात जलक्रांती व हरितक्रांती करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, प्रशासन व जनता या दोघांचा मिलाप होऊन जलयुक्त शिवार अभियान गतीने व यशस्वी होईल. लोकसहभागाशिवाय कामे गतीने होणार नाहीत, तरी विविध सामाजिक संघटना व इतर संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द, पळशी, परकंदी, कुळकजाई, तोंडले, मोगराळे, इंजबाव, संभूखेड, पर्यंती गावातील शेतकरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)