शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

जलयुक्त शिवार यशस्वी करू : गोरे

By admin | Updated: January 30, 2015 23:15 IST

लोकसहभागाशिवाय कामे गतीने होणार नाहीत, तरी विविध सामाजिक संघटना व इतर संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’

 म्हसवड : ‘जलयुक्त शिवार अभियानामध्ये प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सहभागी व्हावे. लोकसहभागातूनच हे अभियान यशस्वी होणार असून, या अभियानाच्या संधीतून जनतेने आपल्या गावात अधिकाधिक जलसंधारणाची कामे हाती घेऊन संपूर्ण तालुका टंचाईमुक्त करण्यासाठी सज्ज व्हावे,’ असे आवाहन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.राज्य शासनाच्या वतीने ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त राज्य’ करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द, पळशी, परकंदी, कुळकजाई, तोंडले, मोगराळे, इंजबाव, संभूखेड व पर्यंती या गावातील विविध कामांचा प्रारंभ आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर, उपसभापती अतुल जाधव, पंचायत समिती सदस्य दादासाहेब हुलगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला म्हणाले, ‘दुष्काळी माण व खटाव तालुका अशी ओळख असणाऱ्या दोन्ही तालुक्यांना लागलेला दुष्काळी कलंक पुसण्यासाठी व या भागात जलक्रांती व हरितक्रांती करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, प्रशासन व जनता या दोघांचा मिलाप होऊन जलयुक्त शिवार अभियान गतीने व यशस्वी होईल. लोकसहभागाशिवाय कामे गतीने होणार नाहीत, तरी विविध सामाजिक संघटना व इतर संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द, पळशी, परकंदी, कुळकजाई, तोंडले, मोगराळे, इंजबाव, संभूखेड, पर्यंती गावातील शेतकरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)