शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

१.५४ लाख लोकांना ६८ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: August 18, 2014 23:35 IST

कऱ्हाड, पाटणला सुकाळ : माण, खटावला दुष्काळ

सातारा : जिल्ह्याच्या डोंगरी भागात संततधार पावसाने शेतकरी सुखावला असला दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांत मात्र भयावह परिस्थिती आहे. दरम्यान, दुष्काळी भागाबरोबरच काही सधन तालुक्यांतही टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, येथेही पावसाची प्रतीक्षा आहे. काही दिवसांपूर्वी जावळी, पाटण आणि कऱ्हाड या तीन तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, जोरदार पावसामुळे टँकर पुरवठा बंद झाला आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असले तरी काही ठिकाणी अजूनही शासन यंत्रणा पोहोचली नसल्याची परिस्थिती आहे. धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होत असला तरी तो अजूनही पुरेसा नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात आजमितीस ६४ टँकरने ३२९ गावे आणि वाडी-वस्तींवर पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ८५ गावे आणि २४४ वाड्यांचा समावेश असून, तहानलेल्या लोकांची संख्या १ लाख ५४ हजार ८९ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. खटाव तालुक्यात २२ टँकरने ३५ गावांतील ४८ हजार ८०१ लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात ६ टँकरने १९ गावांतील ३८ हजार ४१२ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.फलटण तालुक्यात १० टँकरने १० गावे व ७२ वाड्यांतील २० हजार ४४८ लोकांना तर वाई तालुक्यात २ टँकरने २ गावांतील ४ हजार ८८९ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)भयावह परिस्थितीजिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत काही भागांत भयावह परिस्थिती आहे. माण आणि खटाव तालुक्यांत पाणलोटची कामे चांगली झाल्यामुळे दुष्काळी गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या अजून उद्भवलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार माण तालुक्यात १९ गावे व १७० वाड्यांतील ४१ हजार ५७९ लोकांना २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.