शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

पावसाच्या जिल्ह्यात विकतच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:37 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षी धो-धो पाऊस पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील धरण, तलाव फेब्रुवारी, मार्चपर्यंत भरलेले असतात. तरीही सातारकरांवर अनेकदा ...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षी धो-धो पाऊस पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील धरण, तलाव फेब्रुवारी, मार्चपर्यंत भरलेले असतात. तरीही सातारकरांवर अनेकदा पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ येते. मार्च महिना सुरू झाला की, पुढील दोन महिने पालिकेकडून पाणी कपात केली जाते. याच काळात लग्नसमारंभ, वास्तुशांतीसारखे समारंभ असतात, तेव्हा पै पाहुण्यांना थंडगार पाणी मिळावे म्हणून जार विकत घेण्याचे जणू ‘फॅड’ आले आहे.

पालिकेकडून दर आठवड्याला पाणी कपात केली जाते, त्यामुळे अनेक नागरिक हे जार पिण्यासाठी घेतात. त्याचप्रमाणे मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये दर दोन दिवसांनी पाच, दहा हजार लीटर क्षमतेचे टँकर मागवावे लागतात. माण, खटाव तालुक्‍यांच्या तर दुष्काळ पाचवीलाच पुजलेला आहे, असं म्हटलं जायचं. पण गेल्या काही वर्षांमध्ये या तालुक्यांमध्ये वाॅटर कप अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. त्यातच गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे सर्व भांडी भरलेली आहेत. त्यामुळे माण तालुक्यात अजून तरी टँकर सुरू झालेला नाही. ही एकीकडे जमेची बाजू असली, तरी सातारा शहरात अजूनही विकत पाणी घ्यावे लागते, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

चौकट...

सहली अन् कार्यालयात

जिल्ह्यात कास, बामणोली, महाबळेश्वर, तापोळा यासारखी असंख्य पर्यटनस्थळे आहेत. याठिकाणी अनेकांच्या कौटुंबिक सहली जात असतात. तेव्हा पिण्याची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या गाडीमध्ये थंडगार पाण्याचा जार घेऊन ते सहलीला जात असतात. त्याचप्रमाणे शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांमध्ये शुद्ध पाण्याची सोय केलेली असली तरी आपत्कालिन परिस्थितीत जार सोयीचा वाटत आहे.

- जगदीश कोष्टी

फोटो

प्रुफ/२०कुलिंग वॉटर जार

प्रुफ/२०वॉटर टँकर.पीएनजी