शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

सहा गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 14:07 IST

पावसाची दडी : हिंगणगाव, मुळीकवाडी धरणांनी गाठला तळ

आॅनलाईन लोकमतआदर्की (जि. सातारा), दि. २२ : फलटण तालुक्यातील हिंगणगाव व मुळीकवाडी धरणातील पाणीसाठा संपत आल्याने मुळीकवाडी, घाडगेवाडी, सासवड, आदर्की बुद्रुक, हिंगणगाव, परहर या सहा गावांवर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

१९९९ मध्ये सासवड प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आली. परंतु कामाचा दर्जा चांगला नसल्याने ही योजना अल्पावधीतच बंद पडली. त्यामुळे मुळीकवाडी, घाडगेवाडी या गावांनी मुळीकवाडी धरणात विहीर खोदून पाणीपुरवठा सुरू केला.

सासवड ग्रामपंचायतीने देखील धरणातून पाईपलाईनद्वारे धरणाचे पाणी सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत सोडले. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा वापर फक्त इतर कामांसाठीच होऊ लागला. आता मुळीकवाडी धरणातही अल्प पाणीसाठा राहिल्याने ऐन पावसात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हिंगणगाव धरणात पाणीसाठा संपत आल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या हिंगणगाव, आदर्की बुद्रुक येथील पाणी योजनांवर संकट निर्माण झाले आहे.