शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

पाणी टंचाईमुळं नवरी मिळेना नवऱ्याला !

By admin | Updated: April 18, 2015 00:08 IST

जंगलवाडीत इच्छुक वरांची पाण्यासाठी वरात : पाळीव जनावरेही पै-पाहुण्यांकडे सोडली

चाफळ : साखरवाडी ते जंगलवाडी दरम्यानच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम संबंधित ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे रखडले आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यात जंगलवाडी ग्रामस्थांना डोंगरातून दोन किलोमीटरची पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तहान भागत नसल्याने अनेकांनी आपली पाळीव जनावरे दुसऱ्या गावास पै-पाहुण्यांच्याकडे पाठवून दिली आहेत. गावाला वर्षोनुवर्ष पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असल्याने या गावातील तरुणांना विवाहासाठी कोणी मुलगी देण्यास तयार होत नाही.सध्या गावामध्ये एक कूपनलिका व एक पाण्याची जुनी विहीर आहे. संबंधित विहीर पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन दोन किलोमीटर अंतरावर एका पाण्याच्या झऱ्याजवळ एक गोल तळे खोदले आहे. त्याठिकाणी एका कुटुंबास फक्त दोनच घागरी पाणी मिळते. दोन घागरीवरच प्रत्येक कुटुंबाला समाधान मानावे लागते. ही येथील सत्यपरिस्थिती आहे. हे दोन घागरी पाणी मिळवण्यासही ग्रामस्थ, महिलांना रात्रंदिवस रांगा लावून दोन किलोमीटरची पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे. या पाण्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होत असली तरी जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर कपडे धुण्यासाठी येथील महिला डोंगर पालथा घालून पायपीट करीत गमेवाडी येथील उत्तरमांड धरणावर येतात.जंगलवाडीच्या नशिबी असणारा पाण्याचा वनवास संपत नसल्याने या गावात मुलगी देण्यासही कोणी तयार होत नाही. गावाचे नाव ऐकुन आणि तेथील एकूण परिस्थिती पाहूनच ‘आमची मुलगी या गावात द्यायची नाही’ असे पालक सांगू लागले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांचे विवाह रखडले आहेत. रस्ता नाही, पाणी नाही, त्यामुळे हे गाव विकास कामांपासून वंचित राहत आहे. रखडलेल्या पाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण झाल्यास या गावाची पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. यासाठी कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील लोकप्रतिनिधिंनी गावातील हा जिव्हाळ्याचा विषयासाठी प्रामाणिक व सामूहिक प्रयत्न करण्याची माफक अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)चोरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साखरवाडी ते जंगलवाडी दरम्यानच्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून येत्या पाच-सहा दिवसांत जंगलवाडी गावास पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या योजनेमुळे जंगलवाडी गावाचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. - बाळासाहेब साळुंखे, चोरेदरवर्षी जनावरांची ससेहोलपटजंगलवाडी ग्रामस्थ पाण्यासाठी झगडत आहेत; पण अशात पाळीव जनावरांचे अतोनात हाल होताना दिसतात. वेळेवर पाणी न मिळाल्याने जनावरे पाण्यासाठी टाहो फोडतात. हे दृष्य ग्रामस्थांचे हृदय पिळवटून टाकते. काही ग्रामस्थांनी या परिस्थितीला कंटाळून आपली जनावरे पाहुण्यांकडे ठेवली आहेत. उन्हाळा संपेपर्यंत ही जनावरे पाहुण्यांकडे ठेवायची व पावसाळ्याच्या सुरुवातीला ती परत घेऊन यायची, असे येथील ग्रामस्थांना दरवर्षी करावे लागते.मुळातच जंगलवाडी गावाची विभागणी दोन तालुक्यांत आहे. गावातील पाण्याचे स्त्रोत खालावल्याने दरवर्षी ग्रामस्थांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईमुळे आमच्या गावातील मुलांना लग्नासाठी कोणी मुलगी देण्यास तयार होत नाही. जंगलवाडीस रस्ता नाही, पिण्याचे पाणी नाही, त्यामुळे अनेकांनी आपली जनावरे पाहुण्याकंडे पाठविली आहेत. - नामदेव माने, ग्रामस्थ, जंगलवाडी