शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

पाणी टंचाईमुळं नवरी मिळेना नवऱ्याला !

By admin | Updated: April 18, 2015 00:08 IST

जंगलवाडीत इच्छुक वरांची पाण्यासाठी वरात : पाळीव जनावरेही पै-पाहुण्यांकडे सोडली

चाफळ : साखरवाडी ते जंगलवाडी दरम्यानच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम संबंधित ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे रखडले आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यात जंगलवाडी ग्रामस्थांना डोंगरातून दोन किलोमीटरची पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तहान भागत नसल्याने अनेकांनी आपली पाळीव जनावरे दुसऱ्या गावास पै-पाहुण्यांच्याकडे पाठवून दिली आहेत. गावाला वर्षोनुवर्ष पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असल्याने या गावातील तरुणांना विवाहासाठी कोणी मुलगी देण्यास तयार होत नाही.सध्या गावामध्ये एक कूपनलिका व एक पाण्याची जुनी विहीर आहे. संबंधित विहीर पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन दोन किलोमीटर अंतरावर एका पाण्याच्या झऱ्याजवळ एक गोल तळे खोदले आहे. त्याठिकाणी एका कुटुंबास फक्त दोनच घागरी पाणी मिळते. दोन घागरीवरच प्रत्येक कुटुंबाला समाधान मानावे लागते. ही येथील सत्यपरिस्थिती आहे. हे दोन घागरी पाणी मिळवण्यासही ग्रामस्थ, महिलांना रात्रंदिवस रांगा लावून दोन किलोमीटरची पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे. या पाण्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होत असली तरी जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर कपडे धुण्यासाठी येथील महिला डोंगर पालथा घालून पायपीट करीत गमेवाडी येथील उत्तरमांड धरणावर येतात.जंगलवाडीच्या नशिबी असणारा पाण्याचा वनवास संपत नसल्याने या गावात मुलगी देण्यासही कोणी तयार होत नाही. गावाचे नाव ऐकुन आणि तेथील एकूण परिस्थिती पाहूनच ‘आमची मुलगी या गावात द्यायची नाही’ असे पालक सांगू लागले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांचे विवाह रखडले आहेत. रस्ता नाही, पाणी नाही, त्यामुळे हे गाव विकास कामांपासून वंचित राहत आहे. रखडलेल्या पाणी योजनेच्या पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण झाल्यास या गावाची पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. यासाठी कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील लोकप्रतिनिधिंनी गावातील हा जिव्हाळ्याचा विषयासाठी प्रामाणिक व सामूहिक प्रयत्न करण्याची माफक अपेक्षा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)चोरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साखरवाडी ते जंगलवाडी दरम्यानच्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून येत्या पाच-सहा दिवसांत जंगलवाडी गावास पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या योजनेमुळे जंगलवाडी गावाचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. - बाळासाहेब साळुंखे, चोरेदरवर्षी जनावरांची ससेहोलपटजंगलवाडी ग्रामस्थ पाण्यासाठी झगडत आहेत; पण अशात पाळीव जनावरांचे अतोनात हाल होताना दिसतात. वेळेवर पाणी न मिळाल्याने जनावरे पाण्यासाठी टाहो फोडतात. हे दृष्य ग्रामस्थांचे हृदय पिळवटून टाकते. काही ग्रामस्थांनी या परिस्थितीला कंटाळून आपली जनावरे पाहुण्यांकडे ठेवली आहेत. उन्हाळा संपेपर्यंत ही जनावरे पाहुण्यांकडे ठेवायची व पावसाळ्याच्या सुरुवातीला ती परत घेऊन यायची, असे येथील ग्रामस्थांना दरवर्षी करावे लागते.मुळातच जंगलवाडी गावाची विभागणी दोन तालुक्यांत आहे. गावातील पाण्याचे स्त्रोत खालावल्याने दरवर्षी ग्रामस्थांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईमुळे आमच्या गावातील मुलांना लग्नासाठी कोणी मुलगी देण्यास तयार होत नाही. जंगलवाडीस रस्ता नाही, पिण्याचे पाणी नाही, त्यामुळे अनेकांनी आपली जनावरे पाहुण्याकंडे पाठविली आहेत. - नामदेव माने, ग्रामस्थ, जंगलवाडी