शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

बामणवाडीत तीन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:39 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी-वानरवाडीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. दोन-तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी-वानरवाडीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. दोन-तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाकडून टॅकरने पाणीपुरवठा केला जात असला, तरी पुरेसे पाणी मिळत नसल्याने जादा टँकरची मागणी केली जात आहे.

बारमाही पाणीसाठा असलेल्या वानरवाडी येथील पाझर तलाव दुरुस्तीचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. तलावातील संपूर्ण पाणी सोडून देण्यात आले आहे. अवकाळी पावसानेही ओढ दिल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत बंद झाले आहेत. वानरवाडी आणि बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बामणवाडी, शिबेवाडी आणि पवारवाडी या चार गावच्या पाणीपुरवठा विहिरीचे पाणी संपुष्टात आले आहे. परिणामी, जणावरांसह पिण्याच्या, खर्चासाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

दहा दिवसांपासून वानरवाडी येथील पाणीपुरवठा विहिरीत दररोज दहा हजार लीटरचे दोन टँकर पाणी सोडले जात आहे.

बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पवारवाडी, शिबेवाडी-कारंडेवाडी विहिरीत एक तर बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडीतील विहिरीत दोन टँकर पाणी दररोज सोडले जात आहे, तरीही बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी या प्रत्येकी गावांत एकएक दिवस पाणी सोडले जात असल्याने, प्रत्येक गावात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

बारमाही पाणीसाठा असलेल्या वानरवाडी पाझर तलावाखालील ओड्यावर सात वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत.

बागायती शेतीसाठी खणण्यात आलेल्या विहिरींची संख्या तीसहून अधिक आहे. या तलावात कायम स्वरूपी पाणीसाठा असल्याने, या विहिरींचे जलस्रोत उन्हाळ्यात ही थोड्या प्रमाणात सुरू असतात. मात्र, दुरुस्तीसाठी तलावातील पाणी सोडून दिल्याने सर्वच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. जनावरांसह पिण्याच्या खर्चासाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

चौकट :

बामणवाडीसह ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सर्व वाड्यांची कायमस्वरूपी पाणी समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत वांग नदीवरून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम दोन वर्षांपासून राजकीय श्रेयवादात रखडले आहे.

चौकट :

बारमाही पाणीसाठा टिकून राहत असलेला वानरवाडी येथील पाझर तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ करण्याच्या हेतूने तलावातील गाळ काढणे, भिंतीची वाढ करण्यासाठी आठ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तलावाखालील गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचीही मोठा प्रश्न सुटणार आहे.