शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

बामणवाडीत तीन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:39 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी-वानरवाडीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. दोन-तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी-वानरवाडीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. दोन-तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाकडून टॅकरने पाणीपुरवठा केला जात असला, तरी पुरेसे पाणी मिळत नसल्याने जादा टँकरची मागणी केली जात आहे.

बारमाही पाणीसाठा असलेल्या वानरवाडी येथील पाझर तलाव दुरुस्तीचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. तलावातील संपूर्ण पाणी सोडून देण्यात आले आहे. अवकाळी पावसानेही ओढ दिल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत बंद झाले आहेत. वानरवाडी आणि बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बामणवाडी, शिबेवाडी आणि पवारवाडी या चार गावच्या पाणीपुरवठा विहिरीचे पाणी संपुष्टात आले आहे. परिणामी, जणावरांसह पिण्याच्या, खर्चासाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

दहा दिवसांपासून वानरवाडी येथील पाणीपुरवठा विहिरीत दररोज दहा हजार लीटरचे दोन टँकर पाणी सोडले जात आहे.

बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पवारवाडी, शिबेवाडी-कारंडेवाडी विहिरीत एक तर बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडीतील विहिरीत दोन टँकर पाणी दररोज सोडले जात आहे, तरीही बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी या प्रत्येकी गावांत एकएक दिवस पाणी सोडले जात असल्याने, प्रत्येक गावात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

बारमाही पाणीसाठा असलेल्या वानरवाडी पाझर तलावाखालील ओड्यावर सात वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत.

बागायती शेतीसाठी खणण्यात आलेल्या विहिरींची संख्या तीसहून अधिक आहे. या तलावात कायम स्वरूपी पाणीसाठा असल्याने, या विहिरींचे जलस्रोत उन्हाळ्यात ही थोड्या प्रमाणात सुरू असतात. मात्र, दुरुस्तीसाठी तलावातील पाणी सोडून दिल्याने सर्वच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. जनावरांसह पिण्याच्या खर्चासाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

चौकट :

बामणवाडीसह ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सर्व वाड्यांची कायमस्वरूपी पाणी समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत वांग नदीवरून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम दोन वर्षांपासून राजकीय श्रेयवादात रखडले आहे.

चौकट :

बारमाही पाणीसाठा टिकून राहत असलेला वानरवाडी येथील पाझर तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ करण्याच्या हेतूने तलावातील गाळ काढणे, भिंतीची वाढ करण्यासाठी आठ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तलावाखालील गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचीही मोठा प्रश्न सुटणार आहे.