शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

बामणवाडीत तीन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:39 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी-वानरवाडीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. दोन-तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी-वानरवाडीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. दोन-तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाकडून टॅकरने पाणीपुरवठा केला जात असला, तरी पुरेसे पाणी मिळत नसल्याने जादा टँकरची मागणी केली जात आहे.

बारमाही पाणीसाठा असलेल्या वानरवाडी येथील पाझर तलाव दुरुस्तीचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. तलावातील संपूर्ण पाणी सोडून देण्यात आले आहे. अवकाळी पावसानेही ओढ दिल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत बंद झाले आहेत. वानरवाडी आणि बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बामणवाडी, शिबेवाडी आणि पवारवाडी या चार गावच्या पाणीपुरवठा विहिरीचे पाणी संपुष्टात आले आहे. परिणामी, जणावरांसह पिण्याच्या, खर्चासाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

दहा दिवसांपासून वानरवाडी येथील पाणीपुरवठा विहिरीत दररोज दहा हजार लीटरचे दोन टँकर पाणी सोडले जात आहे.

बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पवारवाडी, शिबेवाडी-कारंडेवाडी विहिरीत एक तर बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडीतील विहिरीत दोन टँकर पाणी दररोज सोडले जात आहे, तरीही बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी या प्रत्येकी गावांत एकएक दिवस पाणी सोडले जात असल्याने, प्रत्येक गावात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

बारमाही पाणीसाठा असलेल्या वानरवाडी पाझर तलावाखालील ओड्यावर सात वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत.

बागायती शेतीसाठी खणण्यात आलेल्या विहिरींची संख्या तीसहून अधिक आहे. या तलावात कायम स्वरूपी पाणीसाठा असल्याने, या विहिरींचे जलस्रोत उन्हाळ्यात ही थोड्या प्रमाणात सुरू असतात. मात्र, दुरुस्तीसाठी तलावातील पाणी सोडून दिल्याने सर्वच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. जनावरांसह पिण्याच्या खर्चासाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

चौकट :

बामणवाडीसह ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सर्व वाड्यांची कायमस्वरूपी पाणी समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत वांग नदीवरून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम दोन वर्षांपासून राजकीय श्रेयवादात रखडले आहे.

चौकट :

बारमाही पाणीसाठा टिकून राहत असलेला वानरवाडी येथील पाझर तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ करण्याच्या हेतूने तलावातील गाळ काढणे, भिंतीची वाढ करण्यासाठी आठ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तलावाखालील गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचीही मोठा प्रश्न सुटणार आहे.