शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात ठिय्यानंतर कृष्णा कालव्यात पाणी!

By admin | Updated: May 12, 2016 00:12 IST

स्वाभिमानीचा मोर्चा : पाटबंधारे अधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमक; दोन तास केले आंदोलन; कार्यकर्ते आक्रमक

कऱ्हाड : कृष्णा कालव्यामध्ये गेल्या ५२ दिवसांपासून पाणी सोडण्यात आले नाही. परिणामी, शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी मोर्चा काढला. मोर्चाने ते पाटबंधारे कार्यालयावर धडकले. जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अखेर स्वाभिमानीच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाटबंधारे विभागाने तातडीने निर्णय घेऊन दुपारच्या सुमारास कालव्यात पाणी सोडले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.कृष्णा कालव्यासाठी ३ टीएमसी पाणी आरक्षित असूनही आजअखेर फक्त १ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. तसेच कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यात यावे, असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा संबंधित पाठबंधारे विभागातील अधिकाऱ्यांकडून ५२ दिवस उलटूनही पाणी सोडले गेलेले नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगत मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाळवा, कऱ्हाड व पलूस तालुक्यांतील पदाधिकारी शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. कऱ्हाड येथील दत्तचौकातून कृष्णा कालवा, सिंचन प्रकल्प पाठबंधारे कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाचे रूपांतर नंतर ठिय्या आंदोलनामध्ये झाले.मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मोरे, विकासराव देशमुख, भास्कर कदम, दशरथ पाटील, संदीप चौगुले, कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, देवानंद पाटील, बापूसो साळुंखे, प्रकाश देसाई, जयवंत पाटील आदींसह वाळवा, पलूस, कऱ्हाड तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते.संघटनेच्या वतीने यावेळी कृष्णा कालवा सिंचन प्रकल्पाचे सहायक अभियंता विकास पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच जोपर्यंत कालव्याला पाणी सोडले जात नाही. तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नाही. आधी पाणी सोडा मगच उठू, असा इशारा देत आंदोलकांनी पाठबंधारे कार्यालयासमोर ठिय्या मांडला.यावेळी चर्चेसाठी अधिकारी विकास पाटील आले असता आंदोलकांच्या वतीने जोरदार घोषणा देण्यात आल्या. चर्चेदरम्यान आंदोलक पाठबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी शिवाजी मोरे, सचिन नलवडे, विकासराव देशमुख, भास्कर कदम आदींसह शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. दुपारी साडेतीन वाजता कालव्यात संबंधित विभागाकडून पाणी सोडण्यात आले असल्याचे सहायक अभियंता पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)या आहेत मुख्य मागण्याकृ ष्णा कालव्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जावे.पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी.सन २०१६-१७ वर्षाची पाणीपट्टी रद्द करण्यात यावी.उच्च न्यायालयाने आदेश देऊनही पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे तत्काळ पाणी सोडावे अन्यथा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू.