शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

पाणीटंचाईच्या गावात अखेर ‘जलक्रांती’

By admin | Updated: June 30, 2015 00:20 IST

काळगाव पाणलोट प्रकल्प : पश्चिम घाट विकास योजनेतून जल व मृद संधारणाची कामे

सणबूर : पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरवून त्याद्वारे जलक्रांती आणण्याचे काम पाणलोट विकासाच्या कार्यक्रमातून होत असते. काळगाव, ता. पाटण भागात या कार्यक्रमांतर्गत भरीव काम दृष्टीस पडत आहे. त्यामुळे या भागात जलक्रांती झाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम घाट विकास योजनेअंतर्गत १९९९ ते २००६ या कालावधीत या भागात पाणी आडवून जिरविण्याचे मोठे काम झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार काळगाव के. आर. ३०/९ या पाणलोटचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५ हजार ७१८ हेक्टर असून, त्यापैकी ३ हजार ८११ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तर उर्वरित १८०९ हेक्टर क्षेत्र बिगर ओलिताखाली आहे. त्यापैकी १०६० हेक्टर वनक्षेत्र आहे. या पाणलोटात काळगाव, आचरेवाडी, रामिष्टेवाडी, भरेवाडी, सावंतवाडी, कोळगेवाडी, मुट्टलवाडी, टिटमेवाडी, करपेवाडी, बोरगेवाडी, डाकेवाडी, मस्करवाडी, लोटळेवाडी, येळेवाडी, धामणी, चव्हाणवाडी, पाटीलवाडी, शेडगेवाडी, मस्करवाडी १ व २, बादेवाडी, जाधववाडी, कुटरे, सुपुगडेवाडी, पवारवाडी, वाजोली आदी गावांचा व वाड्यांचा समावेश आहे. यापैकी काही गावांना पूर्वी मोठी पाणीटंचाई जाणवत होती. जानेवारी महिन्यापासून पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. खरीप हंगामात पडणाऱ्या पावसावर प्रामुख्याने भात पीक घेतले जायचे. उत्पादन अगदीच मर्यादित होते. उर्वरित ओलीवर ज्वारीचे पीक घेतले जात होते. जनावरांच्या पाण्याची मोठी गैरसोय होती.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रशासनाच्या पश्चिम घाट विकास योजनेतून जल व मृदा संधारणाची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आराखडाही तयार झाला. त्यानंतर दि. ७ डिसेंबर १९९९ रोजी भुरेवाडी येथील मातीनाला बंधाऱ्याच्या कामाचा प्रारंभ तत्कालीन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या पाणलोटात आजअखेर मातीनाला बांध, वळण बंधारे, शेततळी, प्लॅनिंग सीसीटी आदी कामे झाली आहेत. पाणीस्त्रोताचे बळकटीकरण झाल्याने अनेक गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यास मदत झाली. नालाबांध व बंधाऱ्यांतील पाण्याचा वापर करून रब्बी क्षेत्रात वाढ झाली आहे.याशिवाय शेतकरी झेंडू, केळी व पालेभाज्यांची पिकेही घेऊ लागली आहेत. विविध प्रकारची बियाणे आणून शेतीतील नवनवीन प्रयोग ते करीत आहेत. (वार्ताहर) विजेशिवाय शेतीला पाणी...कोळगेवाडीने तर जलसंधारणाच्या माध्यमातून ‘विजेशिवाय शेतीला पाणी’ हा प्रयोग साकारून जलसंधारणाचा ‘कोळगेवाडी पॅटर्न’ महाराष्ट्रापुढे ठेवला आहे. या भागातील अनेक विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. पूर्वीच्या कोरडवाहू क्षेत्रात चाचपडणारा शेतकरी नव्या प्रवाहात येऊ पाहत आहे. ‘कोळगेवाडी पॅटर्न’ला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. प्रकल्पासाठी चार कोटी खर्चलोकप्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांचे या पाणलोटासाठी मोठे सहकार्य लाभले आहे. कृषी विभागाने काढलेल्या या अर्थशास्त्रानुसार एकूण पाणीसाठा ९०४ टीसीएम असून, सुमारे ४ कोटी १ लाख ६० हजार रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पापूर्वीचे बागायती क्षेत्र २६ हेक्टर होते. मात्र प्रकल्पानंतर ते ११७ हेक्टरवर गेले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काळगाव भागातील शेतकरी उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत.