शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाटण तिकाटणे येथील कचऱ्याचा प्रश्न जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

कऱ्हाड : पाटण तिकाटणे पसिरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कचरा ...

कऱ्हाड : पाटण तिकाटणे पसिरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कचरा पडत असून, याबाबत संबंधित विभागाकडून काही कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. कचऱ्यामध्ये अधुनमधून आग लागण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. मांस, अन्नपदार्थ तसेच घरगुती कचरा या ठिकाणी पडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या कचऱ्याच्या कोंडाळ्याभोवत श्वानही घुटमळत असतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी या परिसरातून पायी प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. मोकाट श्वान नागरिकांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कचरा हटवावा, अशी मागणी केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्गावर रिफ्लेक्टरची मागणी

मलकापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर दिवसेंदिवस लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी सूचना तसेच दिशादर्शक फलक आहेत. मात्र, या फलकांना झुडपांनी वेढा घातला आहे. त्यामुळे ते चालकांच्या दृष्टीस पडत नाहीत. दुभाजकात गवत वाढल्यामुळे हे फलक असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहेत. संबंधित विभागाने रिफ्लेक्टर आणि फलक लावण्याची मागणी होत आहे.

साथरोगाची शक्यता; गावोगावी जनजागृती

कऱ्हाड : सध्या वातावरणात बदल होत असल्याने साथरोग पसरत आहेत. या रोगांपासून बचाव करून आरोग्य जपण्याचा तसेच पाणी उकळून पिणे, नियमित औषधे घेण्याच्या सूचना डॉक्टरांकडून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दिल्या जात आहेत. दिवसा उकाडा व रात्रीच्यावेळी कडाक्याची थंडी पडत असल्याने सर्दी, ताप, खोकला असे आजार उद्भवत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने सध्या रुग्णालयेही फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच काही गावांमध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार पसरले आहेत. ही परिस्थिती इतर गावात उद्भवू नये, यासाठी प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याबाबत योग्य ती दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.

डोंगरपठारावरील विद्यार्थ्यांचा पायी प्रवास

पाटण : पाटण तालुक्यातील काही ग्रामीण भागात आजही रस्त्याच्या सुविधा नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. या तालुक्यातील काही गावे डोंगर, जंगल क्षेत्रात असल्यामुळे तेथे दळणवळण तसेच सुविधांची कमतरता आहे. याठिकाणी शासनाकडून आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. लोकप्रतिनिधीही मते मागण्यासाठी या विभागात जातात. त्यावेळी सुविधा पुरविण्याची पोकळ आश्वासने त्यांच्याकडून देण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात कसलीच कार्यवाही केली जात नाही. विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

कार्वे विभागामध्ये ऊस तोडींना आला वेग

कार्वे : शेरे, दुशेरे, कोरेगाव विभागातील ऊस तोडणीने वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी मजुरांनी आपल्या झोपड्या घातल्या आहेत. पहाट होताच हे मजूर शिवाराचा रस्ता धरत आहेत. तसेच दिवसभर ऊसतोड करत थंडीमुळे रात्री लवकर परतत आहेत. शिवारात ऊस तोडीची लगबग सुरू असल्यामुळे शेतकरीही सकाळी लवकर शिवारात जात असून पुढील हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात ते व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.