शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

तिसऱ्या लाटेचा इशारा...त्यातच कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडच्या तिसऱ्या लाटेसंबंधी आवश्यक त्या उपाययोजना करणाऱ्या राज्य शासनाने कोविड उपचार केंद्रांसाठी नेमण्यात आलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडच्या तिसऱ्या लाटेसंबंधी आवश्यक त्या उपाययोजना करणाऱ्या राज्य शासनाने कोविड उपचार केंद्रांसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. त्यात जिल्ह्यातील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे दुर्दैवाने तिसरी लाट आली, तर राज्याचा आरोग्य विभाग अपुऱ्या मनुष्यबळाच्याआधारे त्याला सामोरा कसा जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटी कर्मचारी मदतीला नसल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने मार्च २०२० पासून सर्व संस्थास्तरावर कोविड साथ हाताळणीसाठी मनुष्यबळाला मंजुरी दिली होती. त्यानंतर कोविड संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य सरकारने कोविड उपचार केंद्रासाठी (डीसीएच, डीसीएचसी, सीसीसी) नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा ३१ ऑगस्टपासून संपुष्टात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे मनुष्यबळासाठी निधीच मंजूर नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा कोविड प्रोत्साहन भत्तादेखील १ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी स्वतंत्र बालरोग कक्ष, आयसीयू सेंटर आणि ऑक्सिजन निर्मिती, रुग्णवाहिका, रेमडेसिवीर इंजेक्शनसह ४०० बेड वाढणार आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात लागणार आहे. कंत्राटी कर्मचारी कमी केल्यापासून आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. नोंदी, लसीकरण, रुग्णसेवा, नमुने तपासणी यासह अन्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनुष्यबळ लेखाशीर्षकाअंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून विशेषतज्ज्ञांचे मानधन अदा करण्यात यावे, नियमित व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा कोविड उपचार केंद्र व कोविड केंद्रासाठी घेण्यात याव्यात, कोविडव्यतिरिक्त इतर काम कमी असल्याने सीएचओ, आयुष एमओ, ग्रुप बी एमओ यांच्या सेवाही कोविड उपचार केंद्रांसाठी घेण्यात याव्यात, स्टोअर ऑफिसर व हॉस्पिटल मॅनेजरची पदे रद्द करावीत, कोविडचे रुग्ण वाढल्यास कोविड व्यतिरिक्त इतर सेवा देत असलेल्या रुग्णालयातील कर्मचा-यांची आवश्यकतेनुसार सेवा घेण्यात यावेत, असे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.