शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

विचारांची ज्योत तेवत राहायला हवी- हौतात्म्याला एक वर्ष...

By admin | Updated: August 18, 2014 23:39 IST

धार्मिक क्षेत्रातील प्रतिक्रिया

राजीव मुळ्ये - सातारा --उपासनेला, धर्माला, श्रद्धेला कधीही विरोध न करता, त्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांचा विचारांच्या माध्यमातून समाचार घेणारे, विवेकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांना विचारांनी उत्तर देणे नाकारून त्यांची हत्या होणं धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनाही खटकलंय. डॉक्टरांनी देवा-धर्माला कधीच विरोध केला नाही. मात्र समाजवादी विचार, आर्थिक आणि सामाजिक समता हे उद्दिष्ट मानून सुधारकांचे विचार कृतीत आणले, हे सर्वांनी पाहिलंय. त्यामुळं त्यांच्या विचारांची ज्योत तेवत राहावी, असं धार्मिक क्षेत्रातही मानलं जातं.चुकीच्या कल्पना, चुकीच्या रूढी आणि चुकीच्या विचारांना डॉक्टरांनी आजन्म विरोध केला. आपल्या सुखदु:खाचा विचार न करता आयुष्यभर विचारक्रांतीला वाहून घेतलं. लोकांना चुकीच्या वाटेने जाताना पाहून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला या कामात आयुष्यही गमवावं लागलं, याची खंत इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीही बोलून दाखवितात.धार्मिक क्षेत्रातील प्रतिक्रियाश्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक डॉक्टरांच्या बलिदानानंतर तरी अनेक लोकांना दिसू लागला आहे. जादूटोणा करणाऱ्यांमुळे खऱ्या श्रद्धाळूंच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अंधश्रद्धा कमी झाल्याच पाहिजेत, असे माझे मत आहे. डॉक्टरांच्या बलिदानामुळे लोक या विषयाकडे डोळसपणे पाहू लागतील आणि हळूहळू खऱ्या श्रद्धाच शिल्लक राहतील.- ओंकार बोडस, पुरोहितज्यांनी संपूर्ण आयुष्य चुकीच्या कल्पना, रूढींना विरोध करण्यासाठी वेचले, त्यांना याकामी आयुष्य गमवावं लागलं, याची खंत उभ्या महाराष्ट्राला आहे. त्यांचा पूजेला नव्हे, अघोरी प्रकारांना विरोध होता. विचाराला हिंसेने उत्तर देऊन चालत नाही. येणाऱ्या दिवसांत त्यांचे बुद्धिवादी विचार, जे सावरकर-आगरकरांनीही मांडले, त्याची अंमलबजावणी पुरोगामी महाराष्ट्रात व्हायला हवी.- रमणलाल शहा, ज्योतिषतज्ज्ञमाणूस गरज म्हणून अंधश्रद्धेकडे वळतो. त्याचं मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. गरजवंताचा गैरफायदा घेऊन काही जण शास्त्रोक्त काम न करता पैसे उकळण्याचं काम करतात. त्यातून एखाद्याला लाभ झाला तर तो संबंधिताचा उदोउदो करतो आणि गैरप्रकार वाढत जातात. वैचारिक मतभेद असतील, तर ते चर्चेने सुटू शकतात; मात्र त्यासाठी हिंसेचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत निषेधार्हच!- प्रसाद चाफेकर, वास्तुशास्त्रतज्ज्ञमाणसाच्या वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी धर्माची निर्मिती झाली. माणसावर कायद्यापेक्षाही अधिक धाक धर्माचा असू शकतो; मात्र काही लोकांनी धर्मात नंतर अनावश्यक बाबी आणल्या. अशा बाबी डॉ. दाभोलकरांनी उघड केल्या. त्यांची हत्या होण्याने महाराष्ट्राचे नुकसान झाले असून, मारेकरी न सापडणे हे प्रशासनाचे अपयश होय.- तुषार पाटील, विश्वस्त, भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, करंजे