शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करत ग्रामस्थांना पाणी ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करत ग्रामस्थांना पाणी शोधावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबविण्यासाठी प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

तालुक्यातील घाडगेवाडी या ठिकाणी ऐन उन्हाळ्यात गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्‍याची टंचाई भासत आहे. वारंवार पंचायत समिती व तहसीलदारांच्याकडे मागणी करूनही टँकर देण्यात आला नाही. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. मुळातच डोंगराच्या कडेला असणाऱ्या या गावात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. त्यातच गावाला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने उन्हाळ्याच्या चार महिन्यांत पाण्याची तीव्र टंचाई भासते. यावर्षी पाण्याची कमतरता असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झाली नसल्याने प्रश्न अधांतरीच आहे.

(कोट)

घाडगेवाडी गावाला प्रतिवर्षी पाण्याचा प्रश्न भेडसावतो. यासाठी ग्रामजल योजनेतून योजना राबणे आवश्यक आहे. सध्या एका विहिरीतून दुसऱ्या विहिरीत पाणी सोडले जाते. त्यानंतर गावच्या टाकीत पाणी जाते. यानंतर चार दिवसांतून लोकांना पाणी दिले जाते मात्र त्याचे प्रमाण कमी आहे पाण्यासाठी इतर दिवशी लोकांना यातना सहन कराव्या लागत आहेत.

- हिरालाल घाडगे, उपसरपंच, घाडगेवाडी

फोटो : ११ खंडाळा

खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे पाणीटंचाई भासू लागली असून, ग्रामस्थांना विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.