शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करत ग्रामस्थांना पाणी ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करत ग्रामस्थांना पाणी शोधावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबविण्यासाठी प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

तालुक्यातील घाडगेवाडी या ठिकाणी ऐन उन्हाळ्यात गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्‍याची टंचाई भासत आहे. वारंवार पंचायत समिती व तहसीलदारांच्याकडे मागणी करूनही टँकर देण्यात आला नाही. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. मुळातच डोंगराच्या कडेला असणाऱ्या या गावात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. त्यातच गावाला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने उन्हाळ्याच्या चार महिन्यांत पाण्याची तीव्र टंचाई भासते. यावर्षी पाण्याची कमतरता असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झाली नसल्याने प्रश्न अधांतरीच आहे.

(कोट)

घाडगेवाडी गावाला प्रतिवर्षी पाण्याचा प्रश्न भेडसावतो. यासाठी ग्रामजल योजनेतून योजना राबणे आवश्यक आहे. सध्या एका विहिरीतून दुसऱ्या विहिरीत पाणी सोडले जाते. त्यानंतर गावच्या टाकीत पाणी जाते. यानंतर चार दिवसांतून लोकांना पाणी दिले जाते मात्र त्याचे प्रमाण कमी आहे पाण्यासाठी इतर दिवशी लोकांना यातना सहन कराव्या लागत आहेत.

- हिरालाल घाडगे, उपसरपंच, घाडगेवाडी

फोटो : ११ खंडाळा

खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे पाणीटंचाई भासू लागली असून, ग्रामस्थांना विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.