शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वाई नगर परिषदेने साधला गृह अलगीकरणातील रुग्णांसोबत संवाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

वाई : कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसोबतच गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणेही गरजेचे झाले ...

वाई : कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसोबतच गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणेही गरजेचे झाले आहे. ही गरज लक्षात घेत वाई नगर परिषदेने एक वेगळा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला. गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांच्या शंकांना उत्तरे आणि कोविडसंबंधी योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी रविवारी वाई नगरपालिकेमार्फत त्यांच्याशी थेट ‘झूम’द्वारे संवाद साधण्यात आला.

प्रत्येक कुटुंबाला एक ॲक्सेस देऊन जास्तीत जास्त रुग्ण सामावून घेत, नगराध्यक्ष आणि काही सदस्य, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांच्यासमवेत चर्चा केली. अशाप्रकारचा अनोखा प्रयोग करणारी वाई ही पहिलीच नगर परिषद ठरली आहे. यावेळी रुग्णांशी संवाद साधताना ग्रामीण रुग्णालय, वाई येथील डॉ. देसाई यांनी रुग्णांना गृह अलगीकरणामध्ये असताना कोणती व कशी काळजी घ्यावी, औषधे कोणती घ्यावीत आणि कोणत्या परिस्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, याबद्दल मार्गदर्शन केले. याशिवाय रुग्णांच्या या रोगासंबंधीच्या शंकांचे निरसन करून त्यांची या रोगाबद्दलची भीती व गैरसमज दूर केले. यावेळी नगर परिषदेच्या सर्व सदस्यांनी रुग्णांशी संवाद साधला आणि प्रामुख्याने नगरपालिका त्यांची काळजी घेत असून, त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असा विश्वास दिला. तसेच या विदारक परिस्थितीत ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हे सांगण्याचा प्रयत्न करून या रुग्णांचे मनोबल वाढवले.

या अनोख्या उपक्रमाला गृह अलगीकरणातील रुग्णांनीही चांगला प्रतिसाद दिला. या संवाद कार्यक्रमाला वाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक भारत खामकर, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, किशोर बागुल, दीपक ओसवाल, नगरसेविका रुपाली वनारसे, सुमैय्या इनामदार व ग्रामीण रुग्णालय, वाई येथील डॉ. देसाई, नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, आरोग्य निरीक्षक खोपडे, पाणीपुरवठा अधिकारी क्रांती वाघमळे, आदी उपस्थित होते.

(चौकट )

रुग्णांना दिला आत्मविश्वास

दवाखान्यात बेड आहे का? औषधे, रेमडेसिविर मिळेल का? याचा विचार करायचाच नाही तर घरीच योग्य ते औषधोपचार आणि आहार घेऊन लवकर यातून बरे व्हायचे आहे. आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणीही व्यक्तीने कोणत्याही कारणाने घराबाहेर पडायचे नाही. आपल्याला सर्व गरजेच्या गोष्टी नगरपालिकेमार्फत घरपोच दिल्या जातील. आपले सर्व सदस्य आणि सर्व कर्मचारी हे कायम आपल्यासोबत आहोत, असे मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी सांगितले.

फोटो आहे...