शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

वाई नगर परिषदेने साधला गृह अलगीकरणातील रुग्णांसोबत संवाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

वाई : कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसोबतच गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणेही गरजेचे झाले ...

वाई : कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसोबतच गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणेही गरजेचे झाले आहे. ही गरज लक्षात घेत वाई नगर परिषदेने एक वेगळा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला. गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांच्या शंकांना उत्तरे आणि कोविडसंबंधी योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी रविवारी वाई नगरपालिकेमार्फत त्यांच्याशी थेट ‘झूम’द्वारे संवाद साधण्यात आला.

प्रत्येक कुटुंबाला एक ॲक्सेस देऊन जास्तीत जास्त रुग्ण सामावून घेत, नगराध्यक्ष आणि काही सदस्य, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांच्यासमवेत चर्चा केली. अशाप्रकारचा अनोखा प्रयोग करणारी वाई ही पहिलीच नगर परिषद ठरली आहे. यावेळी रुग्णांशी संवाद साधताना ग्रामीण रुग्णालय, वाई येथील डॉ. देसाई यांनी रुग्णांना गृह अलगीकरणामध्ये असताना कोणती व कशी काळजी घ्यावी, औषधे कोणती घ्यावीत आणि कोणत्या परिस्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, याबद्दल मार्गदर्शन केले. याशिवाय रुग्णांच्या या रोगासंबंधीच्या शंकांचे निरसन करून त्यांची या रोगाबद्दलची भीती व गैरसमज दूर केले. यावेळी नगर परिषदेच्या सर्व सदस्यांनी रुग्णांशी संवाद साधला आणि प्रामुख्याने नगरपालिका त्यांची काळजी घेत असून, त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असा विश्वास दिला. तसेच या विदारक परिस्थितीत ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हे सांगण्याचा प्रयत्न करून या रुग्णांचे मनोबल वाढवले.

या अनोख्या उपक्रमाला गृह अलगीकरणातील रुग्णांनीही चांगला प्रतिसाद दिला. या संवाद कार्यक्रमाला वाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक भारत खामकर, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, किशोर बागुल, दीपक ओसवाल, नगरसेविका रुपाली वनारसे, सुमैय्या इनामदार व ग्रामीण रुग्णालय, वाई येथील डॉ. देसाई, नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, आरोग्य निरीक्षक खोपडे, पाणीपुरवठा अधिकारी क्रांती वाघमळे, आदी उपस्थित होते.

(चौकट )

रुग्णांना दिला आत्मविश्वास

दवाखान्यात बेड आहे का? औषधे, रेमडेसिविर मिळेल का? याचा विचार करायचाच नाही तर घरीच योग्य ते औषधोपचार आणि आहार घेऊन लवकर यातून बरे व्हायचे आहे. आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणीही व्यक्तीने कोणत्याही कारणाने घराबाहेर पडायचे नाही. आपल्याला सर्व गरजेच्या गोष्टी नगरपालिकेमार्फत घरपोच दिल्या जातील. आपले सर्व सदस्य आणि सर्व कर्मचारी हे कायम आपल्यासोबत आहोत, असे मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी सांगितले.

फोटो आहे...