शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

वाघोशी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

आदर्की : गावात असलेली राजकीय फळी, घरात असणारे मतभेद, दुभंगलेली मने जुळविण्यासाठी फलटण तालुक्यातील वाघोशी गावातील तरुण वर्ग, बाहेरगावी ...

आदर्की : गावात असलेली राजकीय फळी, घरात असणारे मतभेद, दुभंगलेली मने जुळविण्यासाठी फलटण तालुक्यातील वाघोशी गावातील तरुण वर्ग, बाहेरगावी असणारे चाकरमानी यांनी वैचारिक मतभेद विसरून विचारांची बैठक घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याने, त्यांचे कौतुक होत आहे.

फलटण तालुक्यातील वाघोशी येथील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. गावात बैठका सुरू झाल्या. उमेदवार शोधाशोध सुरू झाली; पण शासनाने सरपंच आरक्षण निवडणुका झाल्यानंतर होणार असल्याचे जाहीर केले.

बाहेरगावी असलेली चाकरमानी व गावातील तरुण यांनी विचारांची देवाण-घेवाण करून गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी कंबर कसली. रात्रं-दिवस बैठका घेऊन सर्वांच्यामते उमेदवार निवड करून सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये ताराचंद उत्तम पवार, अंकुश रामचंद्र शिंदे, लक्ष्मण मारुती जाधव, भारती महादेव पवार, प्रभावती पांडुरंग पवार, सविता दीपक सुतार, सुजाता हणुमंत गोरे हे सदस्य बिनविरोध निवडले.

बिनविरोध निवडीनंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व तरुण मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.

०८आदर्की

फोटो : वाघोशी (ता. फलटण) ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध झालेल्या सदस्यांचा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.