शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दूषित पाण्याने वाईत काविळीची साथ

By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST

शंभर पेक्षा जास्त रुग्णांवर वाईच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

वाई : वाई बाजार समितीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे दूषित पाणी पिल्याने बाजार समितीत व्यापाऱ्याच्या निमित्ताने येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काविळीची लागण झाली आहे. शंभर पेक्षा जास्त रुग्णांवर वाईच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. वाईसह संपूर्ण तालुक्यात काविळीच्या साथीने थैमान घातले आहे. गेल्या चार दिवसांपासून काविळीचे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये खिशाला चाट लावून उपचार घेत आहेत. वाईच्या ग्रामीण रुग्णालयात ना डॉक्टर, ना जागा, ना काविळीची लस उपलब्ध आहे. ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.वाई शहरात काविळीची साथ जोमाने पसरल्याचे भारतीय जनता पक्षाचे काशिनाथ शेलार, अविनाश फरांदे, शिवसेनेचे विवेक भोसले, चेतन नायकवडी, विशाल मोरे, संदीप जायगुडे यांनी उघड करून बाजार समितीच्या सचिवांना धारेवर धरले. वाईचे तहसीलदार सदाशिव पटदुणे, पालिकेच्या मुख्याधिकारी आशा राऊत, नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी रुग्णालयाला भेट दिली. तहसीलदारांनी डॉक्टर अंजली पतंगे यांच्याशी चर्चा करून बाजार समितीच्या विहिरीचे पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश देत वाई पालिकेला उपाययोजना म्हणून बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करण्यासंबंधी सूचना केल्या. (प्रतिनिधी)