शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

दूषित पाण्याने वाईत काविळीची साथ

By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST

शंभर पेक्षा जास्त रुग्णांवर वाईच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

वाई : वाई बाजार समितीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे दूषित पाणी पिल्याने बाजार समितीत व्यापाऱ्याच्या निमित्ताने येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काविळीची लागण झाली आहे. शंभर पेक्षा जास्त रुग्णांवर वाईच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. वाईसह संपूर्ण तालुक्यात काविळीच्या साथीने थैमान घातले आहे. गेल्या चार दिवसांपासून काविळीचे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये खिशाला चाट लावून उपचार घेत आहेत. वाईच्या ग्रामीण रुग्णालयात ना डॉक्टर, ना जागा, ना काविळीची लस उपलब्ध आहे. ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.वाई शहरात काविळीची साथ जोमाने पसरल्याचे भारतीय जनता पक्षाचे काशिनाथ शेलार, अविनाश फरांदे, शिवसेनेचे विवेक भोसले, चेतन नायकवडी, विशाल मोरे, संदीप जायगुडे यांनी उघड करून बाजार समितीच्या सचिवांना धारेवर धरले. वाईचे तहसीलदार सदाशिव पटदुणे, पालिकेच्या मुख्याधिकारी आशा राऊत, नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी रुग्णालयाला भेट दिली. तहसीलदारांनी डॉक्टर अंजली पतंगे यांच्याशी चर्चा करून बाजार समितीच्या विहिरीचे पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश देत वाई पालिकेला उपाययोजना म्हणून बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करण्यासंबंधी सूचना केल्या. (प्रतिनिधी)