शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
8
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
9
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
10
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
11
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
12
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
13
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
14
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
15
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
16
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
17
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
18
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
19
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
20
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"

पुणे-मुंबईचे पर्यटक लवकरच मेढामार्गे कास पठारावर जाणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2016 23:54 IST

शिवेंद्रराजेंची माहिती : कुसुंबी-कोळघर रस्त्यासाठी सव्वाचार कोटी

सातारा : सातारा-जावळी मतदार संघातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याचे ध्येय ठेवणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर कुसुंबी-कोळघर रस्त्यासाठी तब्बल ४ कोटी २६ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे बामणोली, गाळदेव यासह पंचक्रोशीतील गावे जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा बाजारपेठेस डांबरी रस्त्याने जोडली जाणार आहेत. तसेच पर्यटकही मेढामार्गे कास पठारावर येणार आहेत.‘जेथे रस्ता तेथे विकास’ हे गतिमान विकासाचे सूत्र आहे. जावळी तालुक्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भाग रस्त्याविना विकासापासून वंचित राहत असल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याचा धडाका लावला आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडले तरच ही गावे विकासाच्या प्रवाहात येतील, हे त्यांनी ओळखले आहे. बहुतांश गावे पक्क्या डांबरी रस्त्याने जोडली गेल्याने त्या-त्या गावातील लोकांना आरोग्यासह अन्य आवश्यक सुविधांचा लाभ होत आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पारंबे फाटा, एकीव, चिकनवाडी, सह्याद्रीनगर, अंधारी, कोळघर या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. दरम्यान, कुसुंबी ते कोळघर या घाटरस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होता. या रस्त्याचे काम मार्गी लागल्यास बामणोली, गाळदेव, सह्याद्रीनगर, सांगवी मुरा, तेटली आदी पंचक्रोशीतील गावे तालुक्याच्या मुख्यालयाला जोडली जातील. या भागातील लोकांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघेल. जावळी तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागातील खेडी-पाडी एका चेन लिंकला जोडली जातील, यासाठी हा रस्ता होणे गरजेचे आहे, हे ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या रस्त्याला निधी उपलब्ध होण्यासाठी अथक प्रयत्न केले. कुसुंबी ते कोळघर या साडेसहा किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने याही रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी) कास पर्यटकांना मिळणार शॉर्टकट...जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराला भेट देण्यासाठी पुणे, मुंबई यासह इतर शहरे आणि परदेशातून दरवर्षी असंख्य पर्यटक येत असतात. पुणे, मुंबईमार्गे येणाऱ्या पर्यटकांना साताऱ्यातून कास पठारावर यावे लागते; मात्र कुसुंबी-कोळघर रस्त्यामुळे या पर्यटकांना शॉर्टकट मिळणार आहे. हे पर्यटक पाचवड येथूनच मेढा, कुसुंबी, कोळघर मार्गे कास पठारावर पोहोचणार असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि इंधनाची बचत होणार आहेच; पण एक टोलही (आनेवाडी) वाचणार आहे. त्यामुळे कुसुंबी-कोळघर रस्त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांचीही मोठी गैरसोय दूर होणार आहे.