शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पुणे-मुंबईचे पर्यटक लवकरच मेढामार्गे कास पठारावर जाणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2016 23:54 IST

शिवेंद्रराजेंची माहिती : कुसुंबी-कोळघर रस्त्यासाठी सव्वाचार कोटी

सातारा : सातारा-जावळी मतदार संघातील प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याचे ध्येय ठेवणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर कुसुंबी-कोळघर रस्त्यासाठी तब्बल ४ कोटी २६ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे बामणोली, गाळदेव यासह पंचक्रोशीतील गावे जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा बाजारपेठेस डांबरी रस्त्याने जोडली जाणार आहेत. तसेच पर्यटकही मेढामार्गे कास पठारावर येणार आहेत.‘जेथे रस्ता तेथे विकास’ हे गतिमान विकासाचे सूत्र आहे. जावळी तालुक्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भाग रस्त्याविना विकासापासून वंचित राहत असल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रत्येक गाव डांबरी रस्त्याने जोडण्याचा धडाका लावला आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडले तरच ही गावे विकासाच्या प्रवाहात येतील, हे त्यांनी ओळखले आहे. बहुतांश गावे पक्क्या डांबरी रस्त्याने जोडली गेल्याने त्या-त्या गावातील लोकांना आरोग्यासह अन्य आवश्यक सुविधांचा लाभ होत आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पारंबे फाटा, एकीव, चिकनवाडी, सह्याद्रीनगर, अंधारी, कोळघर या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. दरम्यान, कुसुंबी ते कोळघर या घाटरस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होता. या रस्त्याचे काम मार्गी लागल्यास बामणोली, गाळदेव, सह्याद्रीनगर, सांगवी मुरा, तेटली आदी पंचक्रोशीतील गावे तालुक्याच्या मुख्यालयाला जोडली जातील. या भागातील लोकांचा दळणवळणाचा प्रश्न निकाली निघेल. जावळी तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागातील खेडी-पाडी एका चेन लिंकला जोडली जातील, यासाठी हा रस्ता होणे गरजेचे आहे, हे ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या रस्त्याला निधी उपलब्ध होण्यासाठी अथक प्रयत्न केले. कुसुंबी ते कोळघर या साडेसहा किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने याही रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी) कास पर्यटकांना मिळणार शॉर्टकट...जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराला भेट देण्यासाठी पुणे, मुंबई यासह इतर शहरे आणि परदेशातून दरवर्षी असंख्य पर्यटक येत असतात. पुणे, मुंबईमार्गे येणाऱ्या पर्यटकांना साताऱ्यातून कास पठारावर यावे लागते; मात्र कुसुंबी-कोळघर रस्त्यामुळे या पर्यटकांना शॉर्टकट मिळणार आहे. हे पर्यटक पाचवड येथूनच मेढा, कुसुंबी, कोळघर मार्गे कास पठारावर पोहोचणार असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि इंधनाची बचत होणार आहेच; पण एक टोलही (आनेवाडी) वाचणार आहे. त्यामुळे कुसुंबी-कोळघर रस्त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांचीही मोठी गैरसोय दूर होणार आहे.