शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

महू धरणातून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:40 IST

पाचगणी : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पातील महू धरण जलाशयात पाणीसाठा पूर्ण झाल्याने सोमवारी रात्रीपासून विसर्ग सुरू केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र ...

पाचगणी : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पातील महू धरण जलाशयात पाणीसाठा पूर्ण झाल्याने सोमवारी रात्रीपासून विसर्ग सुरू केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने या यावर्षी प्रथमच धरणे जुलै महिन्यात ओव्हरफ्लो झाली आहेत. महू धरणसुद्धा त्याला अपवाद नाही. भिलार पाचगणी डोंगरमाथ्यावर पडत असलेल्या पावसाचे पाणी धरणात येत असल्याने धरण सोमवारी संध्याकाळी भरून सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे.

या संदर्भात धरण व्यवस्थापनाने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ग्रामस्थांना याबाबत इशारा दिला होता. त्याच रात्री सांडव्यावरून पाणी नदीपात्रात वाहण्यास सुरुवात झाली आहे. अजून धरणाला दरवाजे नसल्याने धरण भरताच सांडव्यावरून पाणी नदीपात्रात वाहण्यास सुरुवात होते.

चौकट :

नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन

सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने येणाऱ्या पाण्याच्या येरव्यात घट झाली असल्याने नदीपात्रात पडणारे पाणी पाचशे क्युसेकच्या आसपास आहे. तरी नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

फोटो २७महू धरण

जावळी तालुक्यातील महू धरणातून विसर्ग सुरू केला आहे. (छाया : दिलीप पाडळे)