शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

गावकारभाऱ्यांनो....कडक पावले उचलण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

औंध :कोरोनाच्या लाटेत खटाव तालुक्यातील अनेक गावे आता ‘हॉटस्पॉट’च्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. गेल्यावर्षीच्या कोरोनाच्या लाटेत ग्रामीण भागापेक्षा ...

औंध :कोरोनाच्या लाटेत खटाव तालुक्यातील अनेक गावे आता ‘हॉटस्पॉट’च्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. गेल्यावर्षीच्या कोरोनाच्या लाटेत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात व शहरातून आलेल्या नागरिकांना लागण होत होती. मात्र, आता ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यांत कोरोनाने आपले हातपाय पसरले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक गावकारभाऱ्यांनी कडक पावले उचलण्याची गरज वाटू लागली आहे.

गेल्यावर्षी खटाव तालुक्यात दि. ५ मे २०२० रोजी खरशिंगे येथे २१ वर्षीय युवक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण खटाव तालुका हादरून गेला होता. एक रुग्ण सापडल्याच्या चर्चेने सोशल मीडियावर बातम्या फिरू लागल्या अन् खटावकरांची झोपच उडाली होती व आज रोजी तालुक्यात दररोज ५०, १००, २०० रुग्ण सापडत आहेत. आमच्याकडे कोरोना नाही म्हणणाऱ्या गावात कोरोना तळ ठोकून आहे. त्यामुळे गावपातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृती समिती व स्वयंसेवकांना पुन्हा आहे, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात काम करावे लागणार आहे. कोणी ऐकत नसेल तर संबंधितावर कडक पावले उचलण्याची वेळ आली आहे.

खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी काळजीने लॉकडाऊन पाळले जात आहे. गांभीर्याने त्याकडे पाहणारी अनेक गावे आहेत; पण काही गावे वेगळ्याच अविर्भावात मिरवत आहेत. आपल्याकडे येत नाही म्हणणाऱ्या गावांच्या वेशीला येऊन कोरोना धडकल्याने आता तरी त्यांचे डोळे उघडणार का, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

चौकट..

कोरोनाची लढाई सर्वांचीच..!

कोरोनाची लढाई ही सर्वांची आहे. मात्र अजूनही त्यात कारण-राजकारण आडवे येत आहे. कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकाने आपल्या गावासाठी वेळ देणे आवश्यक आहे, जे स्वयंस्फूर्तीने काम करतात त्यांच्या पाठीवर निदान शाबासकीची थाप टाका व हातात हात घालून कोरोनाची लढाई लढण्याची वेळ आली आहे.