शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

तलावातील गाळ काढण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:10 IST

म्हावशीत लढा दुष्काळाशी : दीडशे एकर क्षेत्र येणार ओलिताखाली; दुष्काळ कायमचा हटविण्याची प्रतिज्ञा

खंडाळा : तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. यावर मात करण्यासाठी म्हावशी, ता. खंडाळा येथील ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत. लोकसहभागातून गावच्या तलावातील गाळ काढून पाणीसाठवण क्षमता वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनावर अवलंबून न राहता गावच्या समस्येसाठी गावकऱ्यांचे श्रमदान आणि आर्थिक योगदानातून जलसंधारणाचे सुरू केलेले काम तालुक्यासाठी आदर्शवत ठरत आहे.म्हावशी गाव सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच अग्रभागी राहिले आहे. गावचे सुशोभीकरण, वृक्ष लागवड, क्रीडांगण यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन काम केले आहे. यावर्षी गावच्या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय घट झाली. पिण्याच्या पाण्यावर गावकऱ्यांनी टंचाईमुक्तीसाठीही प्रयत्न केले.मात्र, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गावातील लोकांनी मिळून गावची वर्गणी जमा केली. त्यातून तलावातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढविण्याचे काम सुरू केले. त्यामुळे म्हावशी गावातील सुमारे १०० ते १५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शिवाय पाणीसाठवणामुळे परिसरातील विहिरींचीही पाणीपातळी वाढीस लागेल.ग्रामस्थांचे योगदान, गावच्या हद्दीतील कंपन्यांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या मदतीने हे मोठे काम पूर्णत्वास जाणार आहे. गाळ काढण्याच्या या मोहिमेचा शुभारंभ तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या हस्ते झाला. यावेळी गावच्या सरपंच स्वाती माळी, उपसरपंच विठ्ठल राऊत, महेश राऊत, शिवाजी माळी, मंडलाधिकारी एन. सी. महाडिक, गावकामगार तलाठी जोतिराम दगडे, शारदा राऊत, तुळशीराम राऊत, बंडूतात्या राऊत, बाळू राऊत, दत्तात्रय गाढवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या यात्रेचा खर्च वाचवून जलसंधारणासाठी खर्च करणारे हे तालुक्यातील पहिले गाव आहे. त्यामुळे हे काम इतरांना प्रोत्साहित करणारे आहे. (प्रतिनिधी)पाणीटंचाईवर मात करण्यासाठी म्हावशी ग्रामस्थांनी उचललेले पाऊल इतर गावांना प्रेरणादायी आहे. गावच्या लोकसहभागाला प्रशासनाचे सहकार्य राहील. जलसंधारणाची इतरही कामे हाती घेऊन शाश्वत पाणीसाठा निर्माण करता येईल. त्यासाठी लोकांनी पुढे यावे. - शिवाजीराव तळपे, तहसीलदार, खंडाळाखंडाळा तालुक्यातील म्हावशी येथे तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या उपस्थितीत तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.