शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळ काढण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:10 IST

म्हावशीत लढा दुष्काळाशी : दीडशे एकर क्षेत्र येणार ओलिताखाली; दुष्काळ कायमचा हटविण्याची प्रतिज्ञा

खंडाळा : तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. यावर मात करण्यासाठी म्हावशी, ता. खंडाळा येथील ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत. लोकसहभागातून गावच्या तलावातील गाळ काढून पाणीसाठवण क्षमता वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनावर अवलंबून न राहता गावच्या समस्येसाठी गावकऱ्यांचे श्रमदान आणि आर्थिक योगदानातून जलसंधारणाचे सुरू केलेले काम तालुक्यासाठी आदर्शवत ठरत आहे.म्हावशी गाव सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच अग्रभागी राहिले आहे. गावचे सुशोभीकरण, वृक्ष लागवड, क्रीडांगण यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन काम केले आहे. यावर्षी गावच्या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय घट झाली. पिण्याच्या पाण्यावर गावकऱ्यांनी टंचाईमुक्तीसाठीही प्रयत्न केले.मात्र, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गावातील लोकांनी मिळून गावची वर्गणी जमा केली. त्यातून तलावातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढविण्याचे काम सुरू केले. त्यामुळे म्हावशी गावातील सुमारे १०० ते १५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शिवाय पाणीसाठवणामुळे परिसरातील विहिरींचीही पाणीपातळी वाढीस लागेल.ग्रामस्थांचे योगदान, गावच्या हद्दीतील कंपन्यांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या मदतीने हे मोठे काम पूर्णत्वास जाणार आहे. गाळ काढण्याच्या या मोहिमेचा शुभारंभ तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या हस्ते झाला. यावेळी गावच्या सरपंच स्वाती माळी, उपसरपंच विठ्ठल राऊत, महेश राऊत, शिवाजी माळी, मंडलाधिकारी एन. सी. महाडिक, गावकामगार तलाठी जोतिराम दगडे, शारदा राऊत, तुळशीराम राऊत, बंडूतात्या राऊत, बाळू राऊत, दत्तात्रय गाढवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या यात्रेचा खर्च वाचवून जलसंधारणासाठी खर्च करणारे हे तालुक्यातील पहिले गाव आहे. त्यामुळे हे काम इतरांना प्रोत्साहित करणारे आहे. (प्रतिनिधी)पाणीटंचाईवर मात करण्यासाठी म्हावशी ग्रामस्थांनी उचललेले पाऊल इतर गावांना प्रेरणादायी आहे. गावच्या लोकसहभागाला प्रशासनाचे सहकार्य राहील. जलसंधारणाची इतरही कामे हाती घेऊन शाश्वत पाणीसाठा निर्माण करता येईल. त्यासाठी लोकांनी पुढे यावे. - शिवाजीराव तळपे, तहसीलदार, खंडाळाखंडाळा तालुक्यातील म्हावशी येथे तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या उपस्थितीत तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.