शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सहकार्यातून गावचा विकास व्हायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:38 IST

पिंपोडे बुद्रुक : जलसंधारणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात गावागावातील पाण्याची पातळी वाढली आहे. पण उपलब्ध पाण्याचा काटकरीने वापर करणे काळाची ...

पिंपोडे बुद्रुक : जलसंधारणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात गावागावातील पाण्याची पातळी वाढली आहे. पण उपलब्ध पाण्याचा काटकरीने वापर करणे काळाची गरज आहे. पाण्याच्या बाबतीत फक्त स्वत:च्या गावाचा विचार न करता संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा विचार करायला हवा आणि एकमेकांच्या सहकार्यातून सर्व गावांचा विकास व्हायला हवा,’ असे मत ग्राम गौरव प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त कल्पना साळुंखे यांनी मांडले.

ग्रामगौरव प्रतिष्ठान व लोकगौरव विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव तालुक्यातील दहिगाव, आसनगाव, रणदुल्लाबाद, पळशी आदी गावातील शेतकऱ्यांची पाणी पंचायतच्या खळद येथील प्रशिक्षण केंद्रात कार्यशाळा पार पडली. यावेळी ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या विश्वस्त डॉ. सोनाली शिंदे उपस्थित होत्या. यावेळी शेतकऱ्यांना जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि बाजारपेठ यादी विषयांवर मार्गदर्शन केले.

डॉ. सोनाली शिंदे म्हणाल्या, ग्रामगौरव संस्थेच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना तेथील विविध प्रश्नांची ओळख झाली. उपलब्ध असलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर करावा. मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल या अपेक्षेने रासायनिक खतांचा वापर केले जातो. ते न करता आपल्या आरोग्य आणि भविष्यातील पिढीला काही उज्ज्वल भविष्यासाठी सेंद्रिय शेती करावी. त्याच्या माध्यमातून स्वत:चा विकास साध्य करावा.

कोरेगाव तालुक्यातील आसनगाव, दहीगाव, रणदुलाबाद, पळशी आदी गावांतील एकूण ४२ जलमित्र व शेतकरी यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. यात शेतकऱ्यांना जमीन, वनस्पती, पाणी आणि मनुष्य यांच्यातील संबंध तसेच शेती, पाणी, शेती मालाचे विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेतील दुपारच्या सत्रामध्ये शेवरी गावातील एकनाथ कामठे यांच्या शेतावर शेतकऱ्यांनी भेट देऊन सेंद्रिय शेतीची पाहणी केली.

फोटो : ०९ शेतकरी कार्यशाळा

खळद येथील प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या शेतकरी कार्यशाळेत कल्पना साळुंखे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.