शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

सहकार्यातून गावचा विकास व्हायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:38 IST

पिंपोडे बुद्रुक : जलसंधारणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात गावागावातील पाण्याची पातळी वाढली आहे. पण उपलब्ध पाण्याचा काटकरीने वापर करणे काळाची ...

पिंपोडे बुद्रुक : जलसंधारणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात गावागावातील पाण्याची पातळी वाढली आहे. पण उपलब्ध पाण्याचा काटकरीने वापर करणे काळाची गरज आहे. पाण्याच्या बाबतीत फक्त स्वत:च्या गावाचा विचार न करता संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा विचार करायला हवा आणि एकमेकांच्या सहकार्यातून सर्व गावांचा विकास व्हायला हवा,’ असे मत ग्राम गौरव प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त कल्पना साळुंखे यांनी मांडले.

ग्रामगौरव प्रतिष्ठान व लोकगौरव विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव तालुक्यातील दहिगाव, आसनगाव, रणदुल्लाबाद, पळशी आदी गावातील शेतकऱ्यांची पाणी पंचायतच्या खळद येथील प्रशिक्षण केंद्रात कार्यशाळा पार पडली. यावेळी ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या विश्वस्त डॉ. सोनाली शिंदे उपस्थित होत्या. यावेळी शेतकऱ्यांना जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि बाजारपेठ यादी विषयांवर मार्गदर्शन केले.

डॉ. सोनाली शिंदे म्हणाल्या, ग्रामगौरव संस्थेच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना तेथील विविध प्रश्नांची ओळख झाली. उपलब्ध असलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर करावा. मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल या अपेक्षेने रासायनिक खतांचा वापर केले जातो. ते न करता आपल्या आरोग्य आणि भविष्यातील पिढीला काही उज्ज्वल भविष्यासाठी सेंद्रिय शेती करावी. त्याच्या माध्यमातून स्वत:चा विकास साध्य करावा.

कोरेगाव तालुक्यातील आसनगाव, दहीगाव, रणदुलाबाद, पळशी आदी गावांतील एकूण ४२ जलमित्र व शेतकरी यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. यात शेतकऱ्यांना जमीन, वनस्पती, पाणी आणि मनुष्य यांच्यातील संबंध तसेच शेती, पाणी, शेती मालाचे विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेतील दुपारच्या सत्रामध्ये शेवरी गावातील एकनाथ कामठे यांच्या शेतावर शेतकऱ्यांनी भेट देऊन सेंद्रिय शेतीची पाहणी केली.

फोटो : ०९ शेतकरी कार्यशाळा

खळद येथील प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या शेतकरी कार्यशाळेत कल्पना साळुंखे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.