शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

न्हावी बुद्रुक गावाचे नामांतराने झाले जयपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:26 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक या गावाच्या जयपूर या नामांतरास प्रदीर्घ प्रयत्नानंतर यश मिळाले आहे. यासाठी सातारा लोकसभा ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक या गावाच्या जयपूर या नामांतरास प्रदीर्घ प्रयत्नानंतर यश मिळाले आहे. यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे विशेष प्रयत्न कामी आले.

रहिमतपूर-औंध या रस्त्यावर असलेल्या न्हावी बुद्रुक या गावाचे नाव जातिवाचक असल्यामुळे ते बदलून जयपूर करावे, अशी मागणी गावचे सरपंच, जयपूर नामांतर समिती तसेच ग्रामस्थांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. नामांतराचा प्रस्ताव तयार करणे व पाठपुरावा करण्याचे काम नंदकुमार माने, विकास निकम, धनाजी फडतरे, विष्णुदास सुर्वे, तानाजी साळुंखे, शंकर कोकीळ, अशोक माने, महेश दळवी, गणेश फडतरे व संदीप निकम या जयपूर नामांतर समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्याने पूर्ण केले. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा, विभागीय कार्यालय पुणे व महाराष्ट्र शासन यांचेमार्फत केंद्रीय ग्रहमंत्रालय दिल्ली यांचेकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावास केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून १९ मे २०२१ रोजी मान्यता मिळून न्हावी बुद्रुक या गावचे नाव बदलून जयपूर करण्यात आले. याबाबत दि. २३ जून रोजी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिध्द झाले.

न्हावी बुद्रुक गावाचे नाव बदलून जयपूर झाल्याची व अथक प्रयत्नांना यश मिळाल्याची माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली. या वेळी जयपूरच्या सरपंच प्रियंका माने, नामांतर समिती, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, तसेच गावातील विविध मंडळे व ग्रामस्थ यांचेमार्फत खासदार श्रीनिवास पाटील यांचा त्यांचे निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.

फोटो : ०९जयपूर

जयपूर, ता. कोरेगाव हे नाव देण्यास विशेष प्रयत्न केल्याबद्दल खासदार श्रीनिवास पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. (छाया : जयदीप जाधव)