शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

ग्रामसभांना खीळ बसल्याने ग्रामविकासचा गाडा थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST

वरकुटे-मलवडी : राज्यात कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊ नयेत, असे आदेश दि. १२ मे २०२० रोजी ग्रामविकास विभागाने ...

वरकुटे-मलवडी : राज्यात कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊ नयेत, असे आदेश दि. १२ मे २०२० रोजी ग्रामविकास विभागाने काढले होते. जिल्ह्यासह माण तालुक्यात कोरोनाचा आलेख चढताच असल्याने, अद्यापही ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. वर्षभर ग्रामसभा न झाल्याने गावगाड्याच्या विकासाचा वेग मंदावला आहे.

अनेक शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची निवड खोळंबली आहे. आराखडा मंजुरी लांबणीवर गेली आहे.

शासन नियमानुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. पण कोरोनाच्या साथीमुळे आर्थिक वर्ष संपत आले तरी, माण तालुक्यात एकही ग्रामसभा होऊ शकलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांना खीळ बसली आहे. लाभार्थी निवड खोळंबली आहे. १ मे रोजीच्या ग्रामसभेत प्रशासनाकडून अहवाल वाचन केले जाते. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या लाभार्थ्यांची निवड केली जाते. मात्र २०२० या वर्षात एकही ग्रामसभा होऊ न शकल्याने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शिलाई वाटप तसेच स्वच्छतागृहासाठी लाभार्थी निवडता आलेले नाहीत. रोजगार हमी योजनेचा आराखडा १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मंजूर केला जातो. परंतु ही ग्रामसभाही झालीच नाही. वेगवेगळ्या योजनेतून गावात कुठे-कुठे विकासकामे करायची यावर चर्चाच होऊ शकली नाही. पंचायत समितीकडे हा आराखडा सादर करावयाचा असल्याने सदस्यांच्या मासिक बैठकीत तो मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीत विरोधात असलेल्या सदस्यांच्या प्रभागातील कामे डावलण्यात आली असल्याची चर्चा आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित ग्रामसभेत १५व्या वित्त आयोगाचा सुधारित आराखडा मंजूर केला जातो.

हा आराखडा मंजूर करताना ग्रामसभेत सखोल चर्चा होते. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून सुधारित आराखडा मंजूर केला जातो. परंतु, दोन ऑक्टोबरची ग्रामसभा सुद्धा होऊ शकली नाही. त्यानंतर २६ जानेवारीची ग्रामसभा होईल, असे वाटले होते. मात्र तीही रखडली सध्या कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. जिल्ह्यासह माण तालुक्यात दरदिवशी शेकडोच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. आत्तापर्यंत शासनाने ग्रामसभेबाबत कोणतेच आदेश काढले नसल्याने, मार्च महिनाही त्यातच गेला आहे. शासकीय वर्ष एप्रिल महिन्यात सुरू झाले आहे. यामुळे गेले वर्षभर एकही ग्रामसभा झाली नसल्याने थोडाफार परिणाम गावोगावच्या विकासकामांवर झाला आहे.

चौकट :

गावच्या विकासासाठी कोणती योजना कुठे घ्यायची? लाभार्थी कोणकोणते निवडायचे? विकासकामे प्राधान्याने कोणती घ्यायची? याबाबत ग्रामसभेत खलबते होऊन सविस्तर चर्चा व्हायची. काहीवेळा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे कारभारी यांच्यामध्ये खडाजंगी होऊन मतभेद व्हायचे. आता मात्र ग्रामसभाच न झाल्याने, नागरिकांचा विचार न करता सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य म्हणेल तीच पूर्वदिशा अशी स्थिती निर्माण झाली आहे.