शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
2
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
3
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
4
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
5
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
6
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
7
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

भाजी परत मिळेल जीव मिळणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:40 IST

सातारा : सातारा शहरांमध्ये गजबजलेल्या ठिकाणी तसेच मंडईमध्ये भाजीखरेदीसाठी केली. ही गर्दी पाहून साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात माईक घेऊन ...

सातारा : सातारा शहरांमध्ये गजबजलेल्या ठिकाणी तसेच मंडईमध्ये भाजीखरेदीसाठी केली. ही गर्दी पाहून साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात माईक घेऊन जनजागृती केली. मास्क वापरण्यासाठी लोकांपुढे लोटांगण घालून भाजी परत मिळेल जीव मिळणार नाही, असे म्हणत गांधीगिरी मार्गाने लोकांना समज दिली.

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन होणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच किराणा मालाची दुकाने, भाजीमंडई व इतर जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानावर मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत किराणामाल व इतर जीवनावश्यक वस्तू विक्रीला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले तर खायला, प्यायला काही मिळणार नाही, या भीतीमुळे बुधवारी लोकांनी शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

विशेषतः सातारा शहरातील भाजी मंडईमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरुद्ध गेल्या दोन वर्षांपासून जनजागृती करणारे कार्यकर्ते शशिकांत पवार, विनीत पाटील यांनी बुधवारी एक मोहीम हाती घेतली. हातामध्ये कर्णा घेऊन सकाळी बाहेर पडले.

रविवार पेठेतील भाजी मंडई, गोडोली अशा गजबजलेल्या ठिकाणी ते चालत फिरले. माइकवरून लोकांना गर्दी न करण्याबाबतचे आवाहन ते करत होते. मास्क का घातला नाही, अशी विचारणादेखील लोकांना करत होते. अनेकांनी मास्क कानाला अडकवले होते. मात्र हनवटीवर लावून ठेवले होते. अनेक जण खरेदी करताना दिसत होते. विनीत पाटील आणि शशिकांत पवार यांनी मास्क तोंडावर काढू नका आणि गर्दी कमी करा भाजी पुन्हा मिळेल जीव मिळणार नाही, असे भावनिक आवाहन लोकांना केले.

अनेक जण हे आवाहन करूनदेखील गंभीर नसल्याचे पाहायला मिळाले. मास्क लावतो की म्हणणारे अनेक जण त्यांना भेटले. त्यांच्यासमोर या कार्यकर्त्यांनी अक्षरश लोटांगण घातले. त्यांचे पाय धरून दादा, ताई कोरोनाची लाट पसरलेले आहे, जीव महत्त्वाचा आहे. याचा प्रसार थांबवायचा आहे, अशी विनंती करताना पाहायला मिळत होते.

गांधीगिरीची शहरभर चर्चा

शहरामध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या गांधीगिरीची चर्चा रंगली होती. शासकीय यंत्रणा कामांमध्ये गुंतलेले असताना लोकांचे सहकार्य मिळाले नाही तर दुसरी काय तिसरी लाटदेखील उचलून मोठा हाहाकार माजू शकतो. हे लक्षात घेऊन सामाजिक जाणीव असलेले कार्यकर्ते काम धंदा सोडून शहरभर लोकांना जनजागृती करताना दिसले. या कार्यकर्त्यांच्या गांधीगिरीची शहरभर चर्चा सुरू होती.