शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

भाजी परत मिळेल जीव मिळणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:40 IST

सातारा : सातारा शहरांमध्ये गजबजलेल्या ठिकाणी तसेच मंडईमध्ये भाजीखरेदीसाठी केली. ही गर्दी पाहून साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात माईक घेऊन ...

सातारा : सातारा शहरांमध्ये गजबजलेल्या ठिकाणी तसेच मंडईमध्ये भाजीखरेदीसाठी केली. ही गर्दी पाहून साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात माईक घेऊन जनजागृती केली. मास्क वापरण्यासाठी लोकांपुढे लोटांगण घालून भाजी परत मिळेल जीव मिळणार नाही, असे म्हणत गांधीगिरी मार्गाने लोकांना समज दिली.

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन होणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच किराणा मालाची दुकाने, भाजीमंडई व इतर जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानावर मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत किराणामाल व इतर जीवनावश्यक वस्तू विक्रीला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले तर खायला, प्यायला काही मिळणार नाही, या भीतीमुळे बुधवारी लोकांनी शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

विशेषतः सातारा शहरातील भाजी मंडईमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरुद्ध गेल्या दोन वर्षांपासून जनजागृती करणारे कार्यकर्ते शशिकांत पवार, विनीत पाटील यांनी बुधवारी एक मोहीम हाती घेतली. हातामध्ये कर्णा घेऊन सकाळी बाहेर पडले.

रविवार पेठेतील भाजी मंडई, गोडोली अशा गजबजलेल्या ठिकाणी ते चालत फिरले. माइकवरून लोकांना गर्दी न करण्याबाबतचे आवाहन ते करत होते. मास्क का घातला नाही, अशी विचारणादेखील लोकांना करत होते. अनेकांनी मास्क कानाला अडकवले होते. मात्र हनवटीवर लावून ठेवले होते. अनेक जण खरेदी करताना दिसत होते. विनीत पाटील आणि शशिकांत पवार यांनी मास्क तोंडावर काढू नका आणि गर्दी कमी करा भाजी पुन्हा मिळेल जीव मिळणार नाही, असे भावनिक आवाहन लोकांना केले.

अनेक जण हे आवाहन करूनदेखील गंभीर नसल्याचे पाहायला मिळाले. मास्क लावतो की म्हणणारे अनेक जण त्यांना भेटले. त्यांच्यासमोर या कार्यकर्त्यांनी अक्षरश लोटांगण घातले. त्यांचे पाय धरून दादा, ताई कोरोनाची लाट पसरलेले आहे, जीव महत्त्वाचा आहे. याचा प्रसार थांबवायचा आहे, अशी विनंती करताना पाहायला मिळत होते.

गांधीगिरीची शहरभर चर्चा

शहरामध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या गांधीगिरीची चर्चा रंगली होती. शासकीय यंत्रणा कामांमध्ये गुंतलेले असताना लोकांचे सहकार्य मिळाले नाही तर दुसरी काय तिसरी लाटदेखील उचलून मोठा हाहाकार माजू शकतो. हे लक्षात घेऊन सामाजिक जाणीव असलेले कार्यकर्ते काम धंदा सोडून शहरभर लोकांना जनजागृती करताना दिसले. या कार्यकर्त्यांच्या गांधीगिरीची शहरभर चर्चा सुरू होती.