शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

अनलॉकनंतर भाजीपाला महाग; कांदा ५ रुपयांनी वाढला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे निर्बंध असले तरी आता तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला असल्याने काही अंशी शिथिलता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे निर्बंध असले तरी आता तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला असल्याने काही अंशी शिथिलता आली आहे. बाजारपेठ खुली असून भाज्याही मिळू लागल्या आहेत. पण, भाज्या महाग झाल्या आहेत. वांग्यानाही भाव मिळू लागलाय. तर, वाटाणा १०० रुपये किलोपुढे गेला आहे.

जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, माण, खटाव, फलटण, कऱ्हाड या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. हा भाजीपाला जिल्ह्यात विकला जातो. तसेच पुणे आणि मुंबई बाजारांतही पाठविला जातो. जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन होता. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व भाजीविक्रेत्यांवरही संकट आले होते. कारण, शेतमाल विकता येत नव्हता. मात्र, आता जिल्ह्याचा स्तर तीनमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्बंध सैल झाले आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला बाजारपेठ खुली झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

सध्या भाज्यांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. पण, पाऊस होत असल्याने भाजीपाला बाहेर काढताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणच्या मालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बहुतांश भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. फक्त टोमॅटो आणि कोबीला दर कमी मिळत आहे.

चौकट :

टोमॅटो २० ३०

बटाटा ३० ४०

भेंडी ४० ६०

मिरची ४० ६०

कारले ६० ८०

शेवगा ४० ८०

वाटाणा ६० १००

वांगे ४० ६०

....................

चौकट

पुन्हा वरणावर जोर...

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांत भाज्या मिळविताना अडचणी येत होत्या. गल्लीत भाजीविक्रेते यायचे. पण, भाज्या चांगल्या मिळत नव्हत्या. आता भाजीविक्री सुरू आहे. पण, दर वाढलेले आहेत. कोणतीही भाजी ४० रुपयांच्या पुढे आहे. महागाईमुळे अनेकवेळा वरण करावे लागते.

- रमा पवार, गृहिणी

......

सध्या बाजारात पालेभाज्या महागच झाल्या आहेत. कोणतीही भाजी ४० रुपयांच्या आत नाही. वांगी, भेंडी आणि वाटाण्याचा दर वाढत आहे. त्यामुळे अगोदरच महागाई त्यात पुन्हा भाज्यांची वाढ झाल्याने सामान्यांना अधिक झळ पोहोचू लागली आहे.

- सुवर्णा काळे, गृहिणी

...............

म्हणून वाढले दर...

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असतो. त्यामुळे भाजीपाला घेतला आणि पुढे मागणी नसेल तर काय करायचे. यामुळे शेतकरी अधिक प्रमाणात भाजीपाला घेत नाहीत. त्यातच सध्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस होत आहे. यामुळे शेतमाल रानातून बाहेर काढणे अवघड झाले आहे. यामुळेही साताऱ्यात भाज्यांचे दर वाढले आहेत.

- श्यामराव शिंदे, दुकानदार

......

बाजारात भाजीपाला कमी येतोय. याला कारण पाऊस आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी भाजीपाला कमी घेतलाय. भाज्यांना मागणी वाढलीय. अशा

कारणांमुळे भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. पण, लवकरच हे दर कमी होऊ शकतात.

- शरद शिंदे, विक्रेता

...............

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा...

तीन महिन्यांपूर्वी भाजीपाला घेतला होता. पण, कोरोना रुग्ण वाढल्याने विकता आला नाही. आता भाज्यांचे दर वाढले आहेत. तरीही पाऊस सुरू आहे. भाज्यांवर रोग पडत आहे. यामुळे व्यापारीही भाव पाडून भाज्यांची खरेदी करत आहेत.

- राजाराम शिंदे, शेतकरी

.......

दोन महिन्यांपूर्वी मागणी कमी होती. तसेच विक्रीही करता येत नव्हती. त्यामुळे नुकसान झाले. आता भाजीपाला लागवडच नाही. त्यातच

बाजारपेठ खुली झाली आहे. पण, भाज्या मोठ्या प्रमाणात येत नसल्याने दर वाढला. माझ्याकडे आता भाज्याच नाहीत.

- तानाजी पाटील, शेतकरी

........

फोटो आहे...

.........................................................................