शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

अनलॉकनंतर भाजीपाला महाग; कांदा ५ रुपयांनी वाढला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे निर्बंध असले तरी आता तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला असल्याने काही अंशी शिथिलता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे निर्बंध असले तरी आता तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला असल्याने काही अंशी शिथिलता आली आहे. बाजारपेठ खुली असून भाज्याही मिळू लागल्या आहेत. पण, भाज्या महाग झाल्या आहेत. वांग्यानाही भाव मिळू लागलाय. तर, वाटाणा १०० रुपये किलोपुढे गेला आहे.

जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, माण, खटाव, फलटण, कऱ्हाड या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. हा भाजीपाला जिल्ह्यात विकला जातो. तसेच पुणे आणि मुंबई बाजारांतही पाठविला जातो. जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन होता. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व भाजीविक्रेत्यांवरही संकट आले होते. कारण, शेतमाल विकता येत नव्हता. मात्र, आता जिल्ह्याचा स्तर तीनमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्बंध सैल झाले आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला बाजारपेठ खुली झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

सध्या भाज्यांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. पण, पाऊस होत असल्याने भाजीपाला बाहेर काढताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणच्या मालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बहुतांश भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. फक्त टोमॅटो आणि कोबीला दर कमी मिळत आहे.

चौकट :

टोमॅटो २० ३०

बटाटा ३० ४०

भेंडी ४० ६०

मिरची ४० ६०

कारले ६० ८०

शेवगा ४० ८०

वाटाणा ६० १००

वांगे ४० ६०

....................

चौकट

पुन्हा वरणावर जोर...

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांत भाज्या मिळविताना अडचणी येत होत्या. गल्लीत भाजीविक्रेते यायचे. पण, भाज्या चांगल्या मिळत नव्हत्या. आता भाजीविक्री सुरू आहे. पण, दर वाढलेले आहेत. कोणतीही भाजी ४० रुपयांच्या पुढे आहे. महागाईमुळे अनेकवेळा वरण करावे लागते.

- रमा पवार, गृहिणी

......

सध्या बाजारात पालेभाज्या महागच झाल्या आहेत. कोणतीही भाजी ४० रुपयांच्या आत नाही. वांगी, भेंडी आणि वाटाण्याचा दर वाढत आहे. त्यामुळे अगोदरच महागाई त्यात पुन्हा भाज्यांची वाढ झाल्याने सामान्यांना अधिक झळ पोहोचू लागली आहे.

- सुवर्णा काळे, गृहिणी

...............

म्हणून वाढले दर...

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असतो. त्यामुळे भाजीपाला घेतला आणि पुढे मागणी नसेल तर काय करायचे. यामुळे शेतकरी अधिक प्रमाणात भाजीपाला घेत नाहीत. त्यातच सध्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस होत आहे. यामुळे शेतमाल रानातून बाहेर काढणे अवघड झाले आहे. यामुळेही साताऱ्यात भाज्यांचे दर वाढले आहेत.

- श्यामराव शिंदे, दुकानदार

......

बाजारात भाजीपाला कमी येतोय. याला कारण पाऊस आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी भाजीपाला कमी घेतलाय. भाज्यांना मागणी वाढलीय. अशा

कारणांमुळे भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. पण, लवकरच हे दर कमी होऊ शकतात.

- शरद शिंदे, विक्रेता

...............

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा...

तीन महिन्यांपूर्वी भाजीपाला घेतला होता. पण, कोरोना रुग्ण वाढल्याने विकता आला नाही. आता भाज्यांचे दर वाढले आहेत. तरीही पाऊस सुरू आहे. भाज्यांवर रोग पडत आहे. यामुळे व्यापारीही भाव पाडून भाज्यांची खरेदी करत आहेत.

- राजाराम शिंदे, शेतकरी

.......

दोन महिन्यांपूर्वी मागणी कमी होती. तसेच विक्रीही करता येत नव्हती. त्यामुळे नुकसान झाले. आता भाजीपाला लागवडच नाही. त्यातच

बाजारपेठ खुली झाली आहे. पण, भाज्या मोठ्या प्रमाणात येत नसल्याने दर वाढला. माझ्याकडे आता भाज्याच नाहीत.

- तानाजी पाटील, शेतकरी

........

फोटो आहे...

.........................................................................