शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

भाजीपाल्याला समाधानकारक दर मिळेना; बळीराजा हतबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:38 IST

कऱ्हाड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. भाजीपाला बाजारही ...

कऱ्हाड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. भाजीपाला बाजारही बंद आहेत. त्यामुळे कऱ्हाडच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळतात. येथे विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला समाधानकारक दर मिळत नाही. त्यामुळे बळीराजा हतबल झालेला पाहायला मिळतोय.

कऱ्हाडची बाजारपेठ ही सर्वच दृष्टीने मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भाजीपाल्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. सातारा, सांगली जिल्ह्यासह कोकणातील व्यापारी इथला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाला समाधानकारक दर मिळेना. परिणामी शेतकरी हैराण झाला आहे.

सातारा जिल्ह्यातही शहरातील भाजी मंडई बंद आहेत. भाजीपाला फक्त फिरून विक्रीला परवानगी दिली आहे. त्यालाही वेळेचे बंधन घातले आहे. त्याचबरोबर गावोगावचे आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे उत्पादन केलेला माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. मला खरेदी केला तर तो विकायचा कुठे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या साऱ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.

दरम्यान दर चांगला मिळत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा तोडाच केलेला नाही. किंवा मला काढलेला नाही. व्यापाऱ्यांना फोन करून मला घेऊन येऊ का? असे विचारले असता, मालाला ग्राहक नाही; चांगला दर मिळत नाही. असे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पिकवलेल्या या मालाचं करायचं काय या विचाराने शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे.

चौकट

मंगळवारचे होलसेल दर किलोमध्ये

वांगी -५ ते ७ रुपये

टोमॅटो- ८ ते १० रुपये

भेंडी- २५ ते ३० रुपये

कारले- २० ते २५ रुपये

फ्लावर- ५ ते ८ रुपये

कोबी- २ ते ३ रुपये

गवारी - १८ ते २५ रुपये

ढोबळी मिरची- १५ ते १८ रुपये

काकडी- १५ ते २० रुपये

कांदा- ५ ते १३ रुपये

बटाटा - १० ते १८ रुपये

लसूण- ५५ ते ७५ रुपये

हिरवी मिरची- १५ ते २० रुपये

कोट

कोरोनामुळे बाजारपेठ बंद आहे. याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाला आहे. कऱ्हाडच्या बाजारपेठेत कोकणातील व्यापारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. मात्र ३० एप्रिलपर्यंत तेथील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मालाला उठाव नाही. जो माल विक्री केला जातो त्याला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे .

सोमनाथ कुमठेकर

व्यापारी ,कऱ्हाड

फोटो: कऱ्हाड येथे बाजार समितीच्या आवारातील भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.