शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

भाजीपाल्याला समाधानकारक दर मिळेना; बळीराजा हतबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:38 IST

कऱ्हाड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. भाजीपाला बाजारही ...

कऱ्हाड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. भाजीपाला बाजारही बंद आहेत. त्यामुळे कऱ्हाडच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळतात. येथे विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला समाधानकारक दर मिळत नाही. त्यामुळे बळीराजा हतबल झालेला पाहायला मिळतोय.

कऱ्हाडची बाजारपेठ ही सर्वच दृष्टीने मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भाजीपाल्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. सातारा, सांगली जिल्ह्यासह कोकणातील व्यापारी इथला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाला समाधानकारक दर मिळेना. परिणामी शेतकरी हैराण झाला आहे.

सातारा जिल्ह्यातही शहरातील भाजी मंडई बंद आहेत. भाजीपाला फक्त फिरून विक्रीला परवानगी दिली आहे. त्यालाही वेळेचे बंधन घातले आहे. त्याचबरोबर गावोगावचे आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे उत्पादन केलेला माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. मला खरेदी केला तर तो विकायचा कुठे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या साऱ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.

दरम्यान दर चांगला मिळत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा तोडाच केलेला नाही. किंवा मला काढलेला नाही. व्यापाऱ्यांना फोन करून मला घेऊन येऊ का? असे विचारले असता, मालाला ग्राहक नाही; चांगला दर मिळत नाही. असे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पिकवलेल्या या मालाचं करायचं काय या विचाराने शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे.

चौकट

मंगळवारचे होलसेल दर किलोमध्ये

वांगी -५ ते ७ रुपये

टोमॅटो- ८ ते १० रुपये

भेंडी- २५ ते ३० रुपये

कारले- २० ते २५ रुपये

फ्लावर- ५ ते ८ रुपये

कोबी- २ ते ३ रुपये

गवारी - १८ ते २५ रुपये

ढोबळी मिरची- १५ ते १८ रुपये

काकडी- १५ ते २० रुपये

कांदा- ५ ते १३ रुपये

बटाटा - १० ते १८ रुपये

लसूण- ५५ ते ७५ रुपये

हिरवी मिरची- १५ ते २० रुपये

कोट

कोरोनामुळे बाजारपेठ बंद आहे. याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाला आहे. कऱ्हाडच्या बाजारपेठेत कोकणातील व्यापारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. मात्र ३० एप्रिलपर्यंत तेथील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मालाला उठाव नाही. जो माल विक्री केला जातो त्याला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे .

सोमनाथ कुमठेकर

व्यापारी ,कऱ्हाड

फोटो: कऱ्हाड येथे बाजार समितीच्या आवारातील भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.