शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

भाजीपाल्याला समाधानकारक दर मिळेना; बळीराजा हतबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:38 IST

कऱ्हाड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. भाजीपाला बाजारही ...

कऱ्हाड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. भाजीपाला बाजारही बंद आहेत. त्यामुळे कऱ्हाडच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळतात. येथे विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला समाधानकारक दर मिळत नाही. त्यामुळे बळीराजा हतबल झालेला पाहायला मिळतोय.

कऱ्हाडची बाजारपेठ ही सर्वच दृष्टीने मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भाजीपाल्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. सातारा, सांगली जिल्ह्यासह कोकणातील व्यापारी इथला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाला समाधानकारक दर मिळेना. परिणामी शेतकरी हैराण झाला आहे.

सातारा जिल्ह्यातही शहरातील भाजी मंडई बंद आहेत. भाजीपाला फक्त फिरून विक्रीला परवानगी दिली आहे. त्यालाही वेळेचे बंधन घातले आहे. त्याचबरोबर गावोगावचे आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे उत्पादन केलेला माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. मला खरेदी केला तर तो विकायचा कुठे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या साऱ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.

दरम्यान दर चांगला मिळत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा तोडाच केलेला नाही. किंवा मला काढलेला नाही. व्यापाऱ्यांना फोन करून मला घेऊन येऊ का? असे विचारले असता, मालाला ग्राहक नाही; चांगला दर मिळत नाही. असे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पिकवलेल्या या मालाचं करायचं काय या विचाराने शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे.

चौकट

मंगळवारचे होलसेल दर किलोमध्ये

वांगी -५ ते ७ रुपये

टोमॅटो- ८ ते १० रुपये

भेंडी- २५ ते ३० रुपये

कारले- २० ते २५ रुपये

फ्लावर- ५ ते ८ रुपये

कोबी- २ ते ३ रुपये

गवारी - १८ ते २५ रुपये

ढोबळी मिरची- १५ ते १८ रुपये

काकडी- १५ ते २० रुपये

कांदा- ५ ते १३ रुपये

बटाटा - १० ते १८ रुपये

लसूण- ५५ ते ७५ रुपये

हिरवी मिरची- १५ ते २० रुपये

कोट

कोरोनामुळे बाजारपेठ बंद आहे. याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाला आहे. कऱ्हाडच्या बाजारपेठेत कोकणातील व्यापारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. मात्र ३० एप्रिलपर्यंत तेथील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मालाला उठाव नाही. जो माल विक्री केला जातो त्याला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे .

सोमनाथ कुमठेकर

व्यापारी ,कऱ्हाड

फोटो: कऱ्हाड येथे बाजार समितीच्या आवारातील भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.