शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

भाजीपाला आवक वाढली;पण दर गडगडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

प्रमोद सुकरे कराड : सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वांना धडकी भरवत आहे.‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने ...

प्रमोद सुकरे

कराड : सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वांना धडकी भरवत आहे.‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने कडक संचारबंदी लावली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. भाजीपाला बाजारही बंद आहेत. त्यामुळे कराड शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आवक वाढलेली असताना खरेदीदार मात्र कमी आहेत. परिणामी भाजीपाल्यांचे दर गडगडले आहेत. शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कराडची बाजारपेठ मध्यवर्ती बाजारपेठ मानली जाते. भाजीपाल्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रोज लाखोंच्या भाजीपाल्याची विक्री होते. कराडसह सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर येथील व्यापारी भाजीपाला खरेदीला येथे येतात. तसेच कर्नाटकातील बेळगावला; रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातल्या परिसरातही कराडच्या बाजार समितीतून भाजीपाला मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जातो.

कोरोनामुळे मात्र सध्या बाजारपेठा बंद अवस्थेत आहेत. शहरातील भाजी मंडई, गावोगावचे आठवडा बाजार बंद झाले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करून तो विकायचा कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी व्यापारीवर्ग खरेदीला अत्यल्प प्रमाणात आहे. याउलट स्वतः बाजारात भाजीपाला विकणारा शेतकरी बाजार बंद असल्याने तो बाजार समितीतच होलसेल दराने भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे येथील आवकही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

सोमवारी कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक खूपच झाली होती. पण तुलनेने खरेदीदार व्यापारी कमी असल्याने बराच माल पडून राहिला आहे. जो किरकोळ माल विकला गेला तो अत्यंत कमी दरात विकला गेला आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. घातलेला खर्चही त्यांच्या पदरात पडताना दिसत नाही. त्यामुळे तो हतबल झाला आहे.

मालाचा उठाव होत नसल्याने बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना माल घेऊन येऊ नका अशा सूचना दिलेल्या आहेत. आता हा माल कुठे विकायचा? हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला पडला आहे. त्यामुळे तो बाजार समितीतच माल घेऊन येताना दिसत आहे; मात्र आपल्याला योग्य दर मिळत नसल्याने, कवडीमोल दराने भाजीपाला विकला जात असल्याने त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येताना दिसत आहे.

चौकट

भाजीपाला होलसेल दर

(आजचे व पूर्वीचे )

* वांगी - ५ रुपये किलो; २५ रुपये किलो

* भेंडी - २0 रुपये किलो; ४५ रुपये किलो

* टोमॅटो - ७. ५0 रुपये किलो; २0 रुपये किलो

* फ्लाॅवर- १.५0 रुपये किलो, १८ रुपये किलो

* कोबी -१.७५ रुपये किलो, १५ रुपये किलो

* आले- १0 रुपये किलो; ४0 रुपये किलो

कोट

कराड शेती उत्पन्न बाजार समितीत कराडसह खटाव, कोरेगाव येथून भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो; मात्र सध्या आठवडा बाजार बंद आहेत. जिल्हा बाहेर माल जात नाही. कोकणातही सर्व बंद आहे. त्यामुळे भाजीपाल्याला उठाव नाही. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे.

महादेव देसाई

सभापती; शेती उत्पन्न बाजार समिती, कराड.