शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

साताऱ्यात हाॅस्पिटलमध्ये बेड मिळविण्यासाठी वशिलेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

सातारा : शहरामध्ये सध्या वशिलेबाजीसाठी एकमेकांचे फोन खणाणत असून, ही वशिलेबाजी इतर कारणांसाठी नसून रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी सुरू ...

सातारा : शहरामध्ये सध्या वशिलेबाजीसाठी एकमेकांचे फोन खणाणत असून, ही वशिलेबाजी इतर कारणांसाठी नसून रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी सुरू असल्याचे समोर येत आहे. ज्यांचा वशिला चालतोय त्या ठिकाणी बेड उपलब्ध होतायत, पण ज्यांचा वशिलाच नाही, असे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. या वशिलेबाजीमध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात सध्या काेरोनाने हाहाकार माजविला आहे. जिल्ह्यातील १७ कोरोना सेंटर आणि इतर ४८ खासगी रुग्णालय अशा एकूण ६५ रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार केले जात आहेत. कोरोना सेंटरमध्ये १ हजार १६३ बेडची, तर इतर ४८ रुग्णालयांमध्ये १ हजार ३४९ बेडची क्षमता आहे. म्हणजे २ हजार ५१२ रुग्णांवर एकाचवेळी उपचार होतील, अशी क्षमता असणारी रुग्णालये कार्यरत आहेत. मात्र, गत काही दिवसांपासून या सर्व रुग्णालयांमध्ये एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात येते. वास्तविक सर्वसामान्य रुग्णांना बेड कोणत्या रुग्णालयांमध्ये शिल्लक आहेत, हे समजतच नाही. कारण जिल्हा प्रशासनाने दिलेली वेबसाइट ही अपडेट नसल्याने माहिती मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे अनेक रुग्ण बाधित रुग्णाला सोबत घेऊन शहरातील रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र, तरीही त्यांना बेड शिल्लक नसल्याचेच सांगण्यात येते, पण ज्यांचा वशिला दांडगा आहे ते लोक मात्र अमुक व्यक्तीमुळे आमच्या नातेवाइकाला बेड मिळाला, असे सांगत असतात. तेव्हा खरोखरच ज्यांचा कुठे वशिला नाही. कोणी ओळखीचे नाही, अशा लोकांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चाैकट : सकाळी रिकामे..अन् संध्याकाळी फुल्ल

कोरोनाबाधित अहवाल आल्यानंतर अनेकजण सकाळी रुग्णालयात गेल्यानंतर बेड त्यांना मिळतो, पण रात्री गेल्यानंतर शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. खरं रात्रीच्या सुमारास घरात बाधिताची प्रकृती अचानक बिघडली, तर रात्री रुग्णाला घेऊन जाणार कुठे, असा प्रश्न नातेवाइकांसमोर पडतोय. त्यामुळे नेमके बेड शिल्लक कुठे आहेत. नसेल तर काय करायला हवे, याची माहती प्रशासनाने रोजच्या रोज दिली तर नागरिकांची दिशाभूल होणार नाही.

चाैकट : घरी तरी गोळ्या द्या..

अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध होणे शक्य नाही. मात्र, जे घरी राहून उपचार घेत आहेत. अशा बाधितांना घरी औषधे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने नियोजन करायला हवे. बाधितांचे नातेवाईक त्यांच्यासोबत राहत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून कोणी घरी गेल्यास रुग्णांना दिलासा तर मिळेलच, शिवाय उपचारही होतील, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.