शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉल्व्हला गळती... दूषित पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST

शामगाव : करवडी (ता. कऱ्हाड) येथे व्हॉल्व्हला गळती लागल्यामुळे गत महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे ...

शामगाव : करवडी (ता. कऱ्हाड) येथे व्हॉल्व्हला गळती लागल्यामुळे गत महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी याची त्वरित दुरुस्ती करून पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

संपूर्ण जगावर कोरोनासारख्या रोगाचे संकट आहे, अशा या भयानक साथरोगाचा सामना करण्यासाठी शासकीय व लोकांकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. लोक अगदी शिंका आल्या तरी घाबरून जात आहेत. यापासून वाचण्यासाठी गरम पाणी पिणे, वाफ घेणे आदी घरगुती उपचार लोक करत आहेत व आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. अशी भयंकर परिस्थिती असताना करवडी येथे पिण्याचे पाणी दूषित येत आहे. गत महिन्यापासून गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील व्हॉल्व्हना गळती लागली आहे.

लिकेज व्हॉल्व्हमध्ये मिसळल्यामुळे गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या साथरोगाने गावांमध्ये प्रवेश केला तर आवरणे कठीण होईल. ग्रामस्थांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिले आहे. परंतु यावरील उपाययोजना त्यांच्याकडून युद्धपातळीवर केल्या जात नाहीत. गत जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी ग्रामपंचायतीने त्वरित याकडे लक्ष घालून ग्रामस्थांचे आरोग्य वाचवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

(कोट..)

गावांमध्ये गत महिन्यापासून पाणीपुरवठा पाईपलाईनवरील व्हॉल्व्हना गळती लागली आहे. त्यामुळे गटाराचे पाणी मिसळल्याने गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिली आहे. परंतु ग्रामपंचायतीकडून यावर उपाययोजना होत नाही, तरी हा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तरी याची त्वरित दुरुस्ती व्हावी.

-वैभव चव्हाण, करवडी, ग्रामस्थ

चौकट

पिण्यासाठी विकतचे पाणी...

गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी लोकांना शुद्ध पाणी विकत घेऊन प्यावे लागते आहे. गरिबांना हे परवडणारे नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून दुरुस्त करावे, अशी मागणी होत आहे.

फोटो आहे..

१४शामगाव

करवडी (ता. कऱ्हाड) येथे व्हॉल्व्हला गळती लागल्यामुळे गत महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. (छाया : बाळकृष्ण शिंदे)