शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

‘वजराई’च्या वेगाला भुलली वीज - : परळी खोऱ्यातील नागरिकांनी मुंबईत स्थापन केलेल्या मंडळाचा पुढाकार

By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST

सतराशे फुटांवरून जलप्रपात

 परळी : देशातील सर्वांत उंच धबधबा म्हणून वजराई धबधब्याची ओळख आहे. सुमारे सतराशे फूट उंचीवरून पाणी कोसळत असल्यामुळे याठिकाणी वीजनिर्मिती होऊ शकते. शिवाय हा धबधबा बारमाही कोसळत असल्यामुळे येथे वीजनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. याबाबत महावितरण कंपनीशी चर्चा सुरू असल्याची माहिती परळी खोऱ्यातील मुंबई मंडळाचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली. सुमारे सोळाशे ते सतराशे फुटांवरून कोसळणाऱ्या ‘वजराई’चा थरार आता जवळून अनुभवता येणार आहे. धबधब्याच्या समोर प्रेक्षा गॅलरी बांधण्याचे नियोजन असून पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटता यावा, यासाठी या परिसरात विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. कास पुष्प पठार, ठोसेघरचा धबधबा, सज्जनगड, चाळकेवाडीचे पवनचक्की पठार, उरमोडी, कण्हेर धरण अन् रानफुलांनी बहरलेला हिरवागार परिसर यामुळे साताऱ्याचा पश्चिम भाग पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे. आता त्यात भर पडली आहे ती भांबवली येथील वजराई धबधब्याची. निसर्गसौंदर्याने नटलेला हा परिसर पर्यटकांना खुणावू लागला आहे. कास पठारावरील वजराई धबधबा सोळाशे आणि सतराशे फुटांवरून दोन टप्प्यांत कोसळत आहे. त्यामुळे पाणी पडण्याचा वेग प्रचंड आहे. या नैसर्गिक स्थितीचा वापर वीजनिर्मितीसाठी चांगल्याप्रकारे होणार आहे. यामुळे भविष्यात विजेचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे. समुद्रसपाटीपासून देशातील सर्वांत उंच असणारा धबधबा म्हणून याची ओळख आहे. पर्यटनाच्या दृष्टीने याचे महत्त्व वाढले असून ‘वजराई’चा जलप्रपात समोरून अनुभवता यावा, पर्यटकांना सुरक्षित निसर्गाचा आनंद लुटता यावा, याठिकाणी त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी पर्यटन विकास महामंडळ व आमदार निधी या माध्यमातून आता येथे विविध सुविधांबरोबरच प्रेक्षा गॅलरी उभारण्यात येणार आहे. या ठिकाणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर) वजराईचा धबधबा भांबवली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटकांना याठिकाणी व्यवस्थित पोहोचता यावे, यासाठी पादचारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी सिमेंटचे बाक, विश्रामगृह आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. जिल्ह्याचा पश्चिम भाग नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. येथील निसर्गसौंदर्याचा लाभ उठवून पर्यटन क्षेत्रासाठी प्रयत्न व्हावेत. वनाच्छादित भाग असल्यामुळे अनेक औषधी वनस्पती आढळून येतात. त्यावर प्रक्रिया करणारे छोटे उद्योग सुरू करता येऊ शकतात. याठिकाणी दरवर्षी राज्यभरातून हजारो पर्यटक भेटी देतात. रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केल्यास स्थानिकांना फायदा होईल.