शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

‘वजराई’च्या वेगाला भुलली वीज - : परळी खोऱ्यातील नागरिकांनी मुंबईत स्थापन केलेल्या मंडळाचा पुढाकार

By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST

सतराशे फुटांवरून जलप्रपात

 परळी : देशातील सर्वांत उंच धबधबा म्हणून वजराई धबधब्याची ओळख आहे. सुमारे सतराशे फूट उंचीवरून पाणी कोसळत असल्यामुळे याठिकाणी वीजनिर्मिती होऊ शकते. शिवाय हा धबधबा बारमाही कोसळत असल्यामुळे येथे वीजनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. याबाबत महावितरण कंपनीशी चर्चा सुरू असल्याची माहिती परळी खोऱ्यातील मुंबई मंडळाचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली. सुमारे सोळाशे ते सतराशे फुटांवरून कोसळणाऱ्या ‘वजराई’चा थरार आता जवळून अनुभवता येणार आहे. धबधब्याच्या समोर प्रेक्षा गॅलरी बांधण्याचे नियोजन असून पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटता यावा, यासाठी या परिसरात विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. कास पुष्प पठार, ठोसेघरचा धबधबा, सज्जनगड, चाळकेवाडीचे पवनचक्की पठार, उरमोडी, कण्हेर धरण अन् रानफुलांनी बहरलेला हिरवागार परिसर यामुळे साताऱ्याचा पश्चिम भाग पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे. आता त्यात भर पडली आहे ती भांबवली येथील वजराई धबधब्याची. निसर्गसौंदर्याने नटलेला हा परिसर पर्यटकांना खुणावू लागला आहे. कास पठारावरील वजराई धबधबा सोळाशे आणि सतराशे फुटांवरून दोन टप्प्यांत कोसळत आहे. त्यामुळे पाणी पडण्याचा वेग प्रचंड आहे. या नैसर्गिक स्थितीचा वापर वीजनिर्मितीसाठी चांगल्याप्रकारे होणार आहे. यामुळे भविष्यात विजेचे संकट कमी होण्यास मदत होणार आहे. समुद्रसपाटीपासून देशातील सर्वांत उंच असणारा धबधबा म्हणून याची ओळख आहे. पर्यटनाच्या दृष्टीने याचे महत्त्व वाढले असून ‘वजराई’चा जलप्रपात समोरून अनुभवता यावा, पर्यटकांना सुरक्षित निसर्गाचा आनंद लुटता यावा, याठिकाणी त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी पर्यटन विकास महामंडळ व आमदार निधी या माध्यमातून आता येथे विविध सुविधांबरोबरच प्रेक्षा गॅलरी उभारण्यात येणार आहे. या ठिकाणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर) वजराईचा धबधबा भांबवली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटकांना याठिकाणी व्यवस्थित पोहोचता यावे, यासाठी पादचारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी सिमेंटचे बाक, विश्रामगृह आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. जिल्ह्याचा पश्चिम भाग नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. येथील निसर्गसौंदर्याचा लाभ उठवून पर्यटन क्षेत्रासाठी प्रयत्न व्हावेत. वनाच्छादित भाग असल्यामुळे अनेक औषधी वनस्पती आढळून येतात. त्यावर प्रक्रिया करणारे छोटे उद्योग सुरू करता येऊ शकतात. याठिकाणी दरवर्षी राज्यभरातून हजारो पर्यटक भेटी देतात. रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केल्यास स्थानिकांना फायदा होईल.