शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

वडूजकरांनो, कोरोनाला हरवायचे असेल तर रणनीती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : कोरोना महामारीचे गांभीर्य प्रचंड असल्याने त्यावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. तशा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : कोरोना महामारीचे गांभीर्य प्रचंड असल्याने त्यावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. तशा व्यक्तिगत भावनांचे काहूर सोशल मीडियावर माजले आहे. मात्र, वडूजकर नेहमीच अशा भूमिकेवेळी पाठीमागेच राहिले आहेत. हा इतिहास हुतात्मानगरीला खोडून काढण्याची नामी संधी निर्माण झाली आहे. ही लढाई स्वत:ची स्वत:शीच आहे, हेही विसरून चालणार नाही. शहरातील‌ जलदगतीने वाढलेल्या कोरोनाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देऊन हरवायचे असेल, तर राजकारणाचे जोडे व व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून रणनीती आखणे काळाची गरज बनली आहे.

दुसरी लाट ओसरेलही, पण मग इतर देशांसारखी तिसरी लाट येण्याची नामुश्की तरी आपणावर ओढवणार नाही, याची खबरदारी घेऊन उपाय निर्माण केले पाहिजेत. सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, सेवानिवृत्त जवान व इतर क्षेत्रांतील अनुभवी नागरिकांचा समावेश करून घेता आला पाहिजे. मुळात साथरोग हा उपचारांचा नव्हे तर संसर्ग प्रतिबंध करण्याचा रोग आहे. हे येथील प्रशासनाने समजून रणनीती ठरवली पाहिजे. प्रशासन भविष्यवेध, पूर्वतयारी आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर चालते. भविष्यवेध आणि पूर्वतयारी या दोन्ही बाबतीत आपण कमी पडलो.

मायक्रो प्रशासकीय युनिटची गरज

अत्यंत छोट्या भौगोलिक क्षेत्राकरिता एक तात्पुरते मायक्रो प्रशासकीय युनिट निर्माण करण्यात येऊन त्यांच्यावर कोरोना प्रतिबंध ते उपचाराबाबत समन्वयाची जबाबदारी टाकण्याची ही वेळ आहे. शहराची लोकसंख्या सुमारे २५ हजार आहे. दैनंदिन स्वच्छता, आरोग्य फवारणी यावेळेत नगरपंचायत प्रशासनाच्या सुसूत्रतेचे दृश्य दिसून येत आहे. हे शेकडो कर्मचारी १७ प्रभागांत विभागले, तर रणनीती आखणे सुकर होईल. त्यांच्याकडून मास्क, सामाजिक अंतर, स्वच्छता, ॲम्ब्युलन्सची सोय, बेडची उपलब्धता, औषधांचा पुरवठा आदींबाबत अत्यंत प्रभावीपणे हाताळणी होऊ शकते. त्यांना पोलिसांचा जोड मिळाला, तर अधिक उत्तम होईल.

लोकसहभाग महत्त्वाचा

कोरोनाविरोधातील चळवळीत लोकसहभाग अभावानेच दिसतो. यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक, स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था सहभागी करून घेता येतील. हे लोक मायक्रो युनिटमध्ये 'कोरोना प्रतिबंध' ही संकल्पना स्पर्धेप्रमाणे राबवू शकतात आणि युनिट कंटेनमेंटमध्ये कसे येऊ द्यायचे नाही, याची जबाबदारी ते आपोआपच घेतील. एखाद्या युनिटमध्ये संसर्ग वाढू लागला, तर वरिष्ठ पातळीवरून त्याक्षणी हस्तक्षेप करता येईल. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या वेळी बुथ कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करतात. याही कार्यकर्त्यांची मदत घेता येईल.

अधिकाऱ्यांकडून कारवाईची गरज

प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, नगरपंचायत मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी यांनी शहरात कधीही जाऊन मास्क, सामाजिक अंतर आदींबाबतीत कारवाई केल्यास वातावरणनिर्मिती होऊ शकते. मायक्रो युनिटमध्ये औषध दुकानदार, डॉक्टरांकडे येणारे रुग्ण, याबाबत माहिती संकलित करून सर्दी, खोकला किंवा तापाचे रुग्ण प्राथमिक अवस्थेतच शोधले, तर प्रादुर्भाव रोखता येतो. यावर आणखीही प्रभावी मार्ग असू शकतात. फक्त शोधण्याची मानसिकता नगरपंचायत प्रशासन व येथील नेतेमंडळी आणि प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे. ही महामारी आहे, राजकारण नव्हे. सर्वांना सहभागी करून घेऊन रणनीती आखली, तरच यावर मात होऊ शकेल.