शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वडूज नगरपंचायतीने स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:39 IST

वडूज : वडूज शहरात कोरोनाने उच्छाद मांडला असताना शहरातील लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन गांधीगिरीच्या भूमिकेत आहेत. यांनी येत्या ...

वडूज : वडूज शहरात कोरोनाने उच्छाद मांडला असताना शहरातील लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन गांधीगिरीच्या भूमिकेत आहेत. यांनी येत्या पाच दिवसात डोळ्यावरची पट्टी काढली नाही तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह मुख्याधिकारी यांना आयसोलेशन सेंटरमध्ये कोंडून ठेवण्याचा इशारा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.

कोरोनोच्या दुसऱ्या लाटेने वडूज शहरात धुमाकूळ घातला असताना शहरातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी हे चूल धरून घरात बसले आहेत. वर्षभरात कचरा टेंडरसाठी स्वतंत्र बैठक झाली. परंतु कोरोनोसाठी एकही बैठक नगराध्यक्षांनी बोलावली नाही. वडूज शहरातील नागरिकांना हक्काचे बेड उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यूने थैमान घातले आहे. वास्तविक यापूर्वी नगरपंचायतीने १४व्या वित्त आयोगातून, नगरपंचायत फंडातून किंवा करापोटी जमा झालेल्या विकास शुल्कमधून वडूज शहरासाठी स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारणे गरजेचे होते. सध्या शहरातील नागरिकांना बेड मिळवण्यासाठी सातारा, कर्‍हाड, फलटण आदी ठिकाणी धडपड करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही आमच्या मित्रमंडळातर्फे जन आंदोलनाचा हिसका दाखवल्यानंतर नगरपंचायतीने नवीन शववाहिका वडूजकरांच्या सेवेत सुरू केली. आता नगरपंचायत या शववाहिकेसाठी वडूजमधील नागरिकांकडून अंत्यविधीसाठी कररुपी पावती घेत आहे. यावरून सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा व उदासीनता दिसून येत आहे.

शहरातील नागरिकांना हॉस्पिटल हे युद्धभूमी वाटत असताना नगरपंचायत ही केवळ दिखाव्याच्या कामावर खर्च करत आहे. नगरपंचायतीने नवीन कोरोनो हॉस्पिटल उभारून शहरातील डॉक्टरांना सेवा देण्यासाठी साद घातली पाहिजे. तरच शहरातील नागरिकांचे हाल कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे. नगरपंचायतीने येणाऱ्या पाच दिवसात हॉस्पिटल उभारले नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे, असा गर्भित इशारा शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.

(कोट)

गटारे, रस्ते, स्मशानभूमी, थायमास लॅम्प, कचरा टेंडर अशा मलईदार कामांमध्ये कायम व्यस्त राहणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना वडूजमधील नागरिकांचे हाल होत असतानादेखील पाझर फुटत नाही. या महामारीच्या काळात नगरपंचायत प्रशासन पूर्णतः असफल झाले असून, त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सामाजिक नैतिकता म्हणून संबंधितांनी राजीनामे द्यावेत.

- विजय गोडसे, नागरिक, वडूज