शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
4
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
5
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
6
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
7
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
8
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
9
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
10
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
11
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
12
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
13
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
14
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
15
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
16
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
17
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
18
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
19
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
20
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
Daily Top 2Weekly Top 5

वडूज नगरपंचायतीने स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:39 IST

वडूज : वडूज शहरात कोरोनाने उच्छाद मांडला असताना शहरातील लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन गांधीगिरीच्या भूमिकेत आहेत. यांनी येत्या ...

वडूज : वडूज शहरात कोरोनाने उच्छाद मांडला असताना शहरातील लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन गांधीगिरीच्या भूमिकेत आहेत. यांनी येत्या पाच दिवसात डोळ्यावरची पट्टी काढली नाही तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह मुख्याधिकारी यांना आयसोलेशन सेंटरमध्ये कोंडून ठेवण्याचा इशारा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.

कोरोनोच्या दुसऱ्या लाटेने वडूज शहरात धुमाकूळ घातला असताना शहरातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी हे चूल धरून घरात बसले आहेत. वर्षभरात कचरा टेंडरसाठी स्वतंत्र बैठक झाली. परंतु कोरोनोसाठी एकही बैठक नगराध्यक्षांनी बोलावली नाही. वडूज शहरातील नागरिकांना हक्काचे बेड उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यूने थैमान घातले आहे. वास्तविक यापूर्वी नगरपंचायतीने १४व्या वित्त आयोगातून, नगरपंचायत फंडातून किंवा करापोटी जमा झालेल्या विकास शुल्कमधून वडूज शहरासाठी स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारणे गरजेचे होते. सध्या शहरातील नागरिकांना बेड मिळवण्यासाठी सातारा, कर्‍हाड, फलटण आदी ठिकाणी धडपड करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही आमच्या मित्रमंडळातर्फे जन आंदोलनाचा हिसका दाखवल्यानंतर नगरपंचायतीने नवीन शववाहिका वडूजकरांच्या सेवेत सुरू केली. आता नगरपंचायत या शववाहिकेसाठी वडूजमधील नागरिकांकडून अंत्यविधीसाठी कररुपी पावती घेत आहे. यावरून सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा व उदासीनता दिसून येत आहे.

शहरातील नागरिकांना हॉस्पिटल हे युद्धभूमी वाटत असताना नगरपंचायत ही केवळ दिखाव्याच्या कामावर खर्च करत आहे. नगरपंचायतीने नवीन कोरोनो हॉस्पिटल उभारून शहरातील डॉक्टरांना सेवा देण्यासाठी साद घातली पाहिजे. तरच शहरातील नागरिकांचे हाल कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे. नगरपंचायतीने येणाऱ्या पाच दिवसात हॉस्पिटल उभारले नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे, असा गर्भित इशारा शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.

(कोट)

गटारे, रस्ते, स्मशानभूमी, थायमास लॅम्प, कचरा टेंडर अशा मलईदार कामांमध्ये कायम व्यस्त राहणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना वडूजमधील नागरिकांचे हाल होत असतानादेखील पाझर फुटत नाही. या महामारीच्या काळात नगरपंचायत प्रशासन पूर्णतः असफल झाले असून, त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सामाजिक नैतिकता म्हणून संबंधितांनी राजीनामे द्यावेत.

- विजय गोडसे, नागरिक, वडूज