शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जनावरे धुण्यासाठी पाईपऐवजी बादलीचा वापर

By admin | Updated: May 24, 2016 00:51 IST

दुग्ध व्यावसायिकांचीही सतर्कता : मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत - जलमित्र

सातारा : जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुग्धोत्पादनासाठी असणाऱ्या गायी, म्हशींना उन्हाळ्याच्या दिवसात तर दोन दिवसांतून एकदा धुवावेच लागते. सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे दुग्ध व्यावसायिकांनी पाईपऐवजी बादलीतील पाण्याने जनावरे धुण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे शेकडो लिटर पाण्याची बचत होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, टंचाईमुळे काही शेतकऱ्यांनी मुक्त संचार गोठ्याचेही नियोजन केले आहे. त्यामुळेही पाण्याचा वापर कमी होऊ लागला आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता अधिक आहे. उकाड्याने माणसाचा जीव हैराण झाला आहे. त्याठिकाणी जनावरांची काय स्थिती असेल हा विचारच करवत नाही. अशा स्थितीत जनावरांना पुरेसे पाणी पाजणे, धुणे महत्त्वाचे असते. तसेच दुग्ध उत्पादन देणाऱ्या जनावरांना खूप सांभाळावे लागते. सध्यातर जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय वाढला आहे. गावोगावी दूध देणाऱ्या जनावरांचे गोठे निर्माण होऊ लागले आहेत. जर्सी, गीर, होस्टन अशा गायींच्या तर मुऱ्हा, म्हैसाणा, पंढरपुरी जातीच्या म्हशी गोठ्यात दिसून येत आहे. या दूध देणाऱ्या जनावरांना दोन-तीन दिवसांतून एकदा अंघोळ घालणे आवश्यकच असते. असे असलेतरी उन्हाळ्याच्या काळात तापमान वाढलेले असते. ते मेंटेन करण्यासाठी जनावरांना दररोज धुवावे लागते. गायीला दोन दिवसांतून एकदा धुतले तर चालते; पण म्हशीला दररोज धुवावेच लागते. तरच दुग्धोत्पादनावर परिणाम होत नाही. सध्या तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्याठिकाणी जनावरांच्या धुण्याचे काय असा प्रश्न आहे. असे असलेतरीही काही शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेतानाच पाणी बचतीचाही उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. यापूर्वी शेतकरी गायी, म्हशी धुण्यासाठी मुबलक पाणी वापरत. पाण्याच्या टाकीला पाईप जोडून त्याने जनावरे धुण्यात येत होती. टंचाईमुळे बादलीने पाणी घेऊन जनावरे धुवावी लागत आहेत. यामुळे पाणी वाया जाणे बंद झाले. (प्रतिनिधी) पाणी बचत महत्त्वाची...तीव्र उन्हाळा आहे. त्यामुळे दूध देणाऱ्या जनावरांना दररोज धुणे आवश्यक आहे. मात्र, सध्या टंचाई असल्याने पाणी बचत महत्त्वाची झाली आहे. त्यासाठी जनावरांना पाईपऐवजी बादलीने धुण्यात येत आहे. यामुळे शेकडो लिटर पाण्याची बचत होत आहे. - सतीश जगताप, दुग्ध व्यावसायिक, वरकुटे मलवडी जनावरे धुतानाही पाण्याची बचतसध्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पाणी कमी वापरावे लागत आहे. जनावरे धुण्यासाठीही पाण्याची बचत करण्यात येत आहे. दोन दिवसांतून दूध देणारी जनावरे धुण्यात येतात. त्यासाठी बादलीत पाणी घेऊन जनावरे धुणे सुरू केले आहे. - श्रीकांत कदम, देऊर