शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

‘उरमोडी’तून पाणी सोडले

By admin | Updated: July 30, 2014 23:18 IST

पावसाचा जोर वाढला : कोयना धरणात ६१.५२ टीएमसी पाणी

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार वाढल्यामुळे पाणीसाठाही वाढू लागला आहे. कोयना धरणात बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६१.५२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. दरम्यान, उरमोडी पाणलोट क्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे आणि येवा वाढल्यामुळे धरणातून नदीपात्रात प्रतिसेकंद २००० क्युसेक पाणी सोडले आहे. परिणामी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटण /कोयनानगर : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. खास करून धरण पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. कोयना धरणात गेल्या ३६ तासांत ५.३५ टीएमसी इतका पाणीसाठा वाढला असून, सांयकाळी सहा वाजेपर्यंत झालेला साठा ६१.५२ टीएमसी इतका होता. मंगळवारी सकाळी आठ वाजता धरणात ५६.१८ टीएमसी इतका पाणीसाठा होता.परळी : उरमोडी धरणक्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता धरणात ८.८९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. धरण व्यवस्थापनाने दुपारी बारा वाजल्यानंतर धरणाच्या दरवाजातून प्रतिसेकंद २००० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात सोडले. यामुळे उरमोडी नदी तिरावरील सुमारे १४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तारळे : तारळीची पाणीसाठवण क्षमता ५.८५ टीएमसी असून, आजमितीस ४.८९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणातून ३,१८२ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे.वाई : बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत धोम धरणात ७.५६, कण्हेर धरणात ८.०२, बलकवडी धरणात ३.१४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. (प्रतिनिधी)महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस..!जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण २३.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजअखेर झालेला पाऊस ६२१९.५ मिमी तर तालुकानिहाय सरासरी ५६५.४ मिमी इतकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १२३.२ मिमी पावसाची नोंद महाबळेश्वर तालुक्यात झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात २५३.७ मिमी पाऊस झाला. सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आजअखेर झालेला पाऊस मिमीमध्ये असा : सातारा २०.४ (४८१.५), जावळी ४६.२ (७७६.८), कोरेगाव ४.७ (१६१.६), कऱ्हाड ८.३ (३०५.६), पाटण ३४.१ (८१३.२), फलटण ०.९ (६४.४), माण ०.८ (९१.९), खटाव ३.२ (१७७.३), वाई ९.४ (२१८.२), महाबळेश्वर १२३.२ (२९९५.३), खंडाळा २.५ (१३३.७)