शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

कृषी विज्ञान केंद्रांना अखेरची घरघर...

By admin | Updated: June 12, 2015 00:45 IST

चाफळ विभागातील स्थिती : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम; लाखोंचा निधी पाण्यात; शेतकऱ्यांना मिळेना मार्गदर्शन

चाफळ : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत चाफळसह पाटण तालुक्यातील अनेक गावांत कृषी विज्ञान मंडळांची स्थापना झाली. मात्र गाजावाजा करीत स्थापन झालेली ही मंडळे शेतीविषयक जागृती करण्याचे सोडाच; पण ती अस्तित्वात आहेत की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावात कृषी विभागाचे कार्यालय असतानाही अधिकारीच गायब असल्यामुळे या विज्ञान मंडळांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी यापूर्वी चाफळचा कृषी विभाग सतत जागृत असायचा. चाफळसह माजगाव, पाडळोशी, धायटी, केळोली, नाणेगाव या गावांत कृषी विज्ञान मंडळांची स्थापना करण्यात आल्या; परंतु ही मंडळे जागृत आहेत की नाही? याची कृषी अधिकाऱ्यांनी साधी चौकशीही केली नसल्याचे दिसून येत आहे. ही मंडळे जागृत करणे महत्त्वाचे आहे. मंडळे स्थापन करताना कृषी विभागाने मोठा गाजावाजा केला. कृषी संघटक, सचिव व सदस्य अशी मंडळाची कार्यकारिणीही निवडण्यात आली. काही कृषी सहायकांनी ठराविक गटाच्या मर्जीतील शेतकऱ्यांना हाताशी धरत मंडळाची स्थापना केल्याने शासनाच्या मूळ हेतूला पाने पुसण्याचा प्रकार घडला. त्याचा परिणाम अनेक शेतकऱ्यांवर झाला. शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. संबंधित मंडळांनी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कुचराई केली. त्याचबरोबर काही मंडळांनी अक्षरश: अनुदान लाटण्याचा प्रकार केला. कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, आळंबी, भाजीपाला, फुलशेती, हरितगृहे, गांडूळखत, सेंद्रीय खत आदीबाबत चर्चासत्रे घडवून आणणे क्रमप्राप्त असतानाही असे काहीच घडलेले नाही. यावेळी शासनस्तरावर कृषी विज्ञान मंडळांना टेबल, खुर्च्या, पुस्तके ठेवण्यासाठी लोखंडी कपाट देण्यात आली होती. मात्र आजच्या परिस्थितीत हे साहित्य नक्की कोणाकडे असेल? हे सांगणेसुध्दा कठीण बनले आहे. यावर संबंधित कृषी सहायकांचे नियंत्रण असायला हवे होते; परंतु दोन ते तीन आठवड्यांतून एकदाच चाफळला येणाऱ्या कृषी सहायकांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास वेळ मिळत नसल्याच्याही तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. कृषी सहायकांच्या नियंत्रणाअभावी कृषी विज्ञान मंडळांसाठी मिळालेला शासनाचा लाखोंचा निधी अक्षरश: पाण्यात गेल्याचा प्रकार झाला आहे. याची चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर) वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरजचाफळ विभागात असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रांना ऊर्जितावस्था प्राप्त करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच शासनाच्या विविध योजनांही शेतकऱ्यांपर्यंत सहजपणे पोहोचतील. या कृषी विज्ञान केंद्रांना संजीवनी मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.