शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

कृषी विज्ञान केंद्रांना अखेरची घरघर...

By admin | Updated: June 12, 2015 00:45 IST

चाफळ विभागातील स्थिती : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम; लाखोंचा निधी पाण्यात; शेतकऱ्यांना मिळेना मार्गदर्शन

चाफळ : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत चाफळसह पाटण तालुक्यातील अनेक गावांत कृषी विज्ञान मंडळांची स्थापना झाली. मात्र गाजावाजा करीत स्थापन झालेली ही मंडळे शेतीविषयक जागृती करण्याचे सोडाच; पण ती अस्तित्वात आहेत की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावात कृषी विभागाचे कार्यालय असतानाही अधिकारीच गायब असल्यामुळे या विज्ञान मंडळांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी यापूर्वी चाफळचा कृषी विभाग सतत जागृत असायचा. चाफळसह माजगाव, पाडळोशी, धायटी, केळोली, नाणेगाव या गावांत कृषी विज्ञान मंडळांची स्थापना करण्यात आल्या; परंतु ही मंडळे जागृत आहेत की नाही? याची कृषी अधिकाऱ्यांनी साधी चौकशीही केली नसल्याचे दिसून येत आहे. ही मंडळे जागृत करणे महत्त्वाचे आहे. मंडळे स्थापन करताना कृषी विभागाने मोठा गाजावाजा केला. कृषी संघटक, सचिव व सदस्य अशी मंडळाची कार्यकारिणीही निवडण्यात आली. काही कृषी सहायकांनी ठराविक गटाच्या मर्जीतील शेतकऱ्यांना हाताशी धरत मंडळाची स्थापना केल्याने शासनाच्या मूळ हेतूला पाने पुसण्याचा प्रकार घडला. त्याचा परिणाम अनेक शेतकऱ्यांवर झाला. शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. संबंधित मंडळांनी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कुचराई केली. त्याचबरोबर काही मंडळांनी अक्षरश: अनुदान लाटण्याचा प्रकार केला. कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, आळंबी, भाजीपाला, फुलशेती, हरितगृहे, गांडूळखत, सेंद्रीय खत आदीबाबत चर्चासत्रे घडवून आणणे क्रमप्राप्त असतानाही असे काहीच घडलेले नाही. यावेळी शासनस्तरावर कृषी विज्ञान मंडळांना टेबल, खुर्च्या, पुस्तके ठेवण्यासाठी लोखंडी कपाट देण्यात आली होती. मात्र आजच्या परिस्थितीत हे साहित्य नक्की कोणाकडे असेल? हे सांगणेसुध्दा कठीण बनले आहे. यावर संबंधित कृषी सहायकांचे नियंत्रण असायला हवे होते; परंतु दोन ते तीन आठवड्यांतून एकदाच चाफळला येणाऱ्या कृषी सहायकांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास वेळ मिळत नसल्याच्याही तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. कृषी सहायकांच्या नियंत्रणाअभावी कृषी विज्ञान मंडळांसाठी मिळालेला शासनाचा लाखोंचा निधी अक्षरश: पाण्यात गेल्याचा प्रकार झाला आहे. याची चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर) वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरजचाफळ विभागात असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रांना ऊर्जितावस्था प्राप्त करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच शासनाच्या विविध योजनांही शेतकऱ्यांपर्यंत सहजपणे पोहोचतील. या कृषी विज्ञान केंद्रांना संजीवनी मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.