शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

दोन महिन्यांपूर्वी तपासणी होऊनही दुर्घटना !

By admin | Updated: January 9, 2017 00:09 IST

कारभारावर प्रश्नचिन्ह : मान्सूनपूर्व अन् मान्सुनोत्तर तपासणी अहवालात दडलंय तरी काय ?

जगदीश कोष्टी ल्ल सातारातारळी धरणाच्या दरवाजाचे बॉनेट तुटल्याने अचानक एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. वास्तविक पाहता कोणत्याही धरणाची मान्सूनपूर्व व मान्सुनोत्तर असे दोनवेळा तपासणी करून अहवाल दिला जातो. मात्र, या अहवालात दडलंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तारळी धरणाच्या पाच दरवाजांपैकी मधल्या दरवाजाचे बॉनेट शनिवारी सकाळी अचानक तुटले. त्यामुळे एक हजार क्युसेक विसर्ग तारळी नदीपात्रात होत असल्याने पूरस्थिती उद्भवली होती. अचानक घडलेल्या बाका प्रसंगामुळे धरण व्यवस्थापनही गोंधळले. गळती रोखण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्नही केले. अखेर तांत्रिक कारणे पुढे आल्याने साताऱ्यातून आलेल्या कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी चौदा तासांनी नवीन दरवाजा बसवून गळती रोखली. या घटनेने सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. पालच्या खंडोबाच्या यात्रेतील व्यापाऱ्यातील तारळी नदीकाठीच वाळवंटात दुकाने थाटली होती. ही घटना रात्री घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, या विभागाने वाहून गेलेला पूल एका दिवसात बनवून दिला हेही नक्कीच कौतुकास्पद आहे.धरण उभारण्यापूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या घटनेनंतर खासदार उदयनराजे भोसले, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी धरणाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मंत्री खोत यांनी बांधकामाच्या कारभाराबाबत अहवाल मागविला आहे. परंतु ही घटना घडलीच कशी, या खोलातही जाणे गरजेचे आहे. प्रत्येक धरणाची एप्रिल-मे मध्ये मान्सूनपूर्व आणि मान्सुनोत्तर तपासणी केली जाते. यामध्ये धरणाची उंची, धरण माती, काँक्रीट किंवा दगडातील असल्यास ते कोणत्या प्रकारचे आहे, त्यावरून परिस्थितीचा अहवाल दिला जातो. यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधित विभागाला कळविले जाते. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी सर्व त्रुटी दूर केल्या जातात. मान्सुनोत्तर तपासणी ही शक्यतो १५ आॅक्टोबरनंतर केली जाते. यामध्येही पुन्हा सर्व घटकांची तपासणी केली जाते. अतिउत्साह येऊ शकतो अंगलटतारळी धरणासारख्या घटना क्वचितच घडतात. या घटनेत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी कामे सुरू केली तरी वरिष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे असते. अतिउत्साहात काम करण्यास गेल्यावर होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही. काम करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ लागला तरी चालेल; परंतु अतिउत्साह दाखवता कामा नये, त्यासाठी वरिष्ठांचा सल्ला घेणे महत्त्वाचेच असते, असे मत या विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.धरणाच्या कामाचे यापूर्वी सर्वे झाला. त्यामध्येही धरणाचे काँक्रिट चांगले होते. तरीही बोल्ट उपसून निघाल्याने दुर्घटना कशी घडली हा प्रश्न सर्वांसाठीच अनुत्तरीत आहे. असे उचलतात दरवाजेदरवाजांमध्ये बिघाड असल्यास मनुष्यबळ किंवा विद्युतशक्तीचा वापर केला जातो. तारळी धरणावर विद्युत पुरवठाही कमी पडत असल्याने जनरेटरचा वापर केला जातो. अडचणींचा पिच्छा कायमधरणातील त्रुटींचा पाठपुरावा करताना अनेक अडचणी येतात. यामध्ये पाण्याच्या आतमधील काम असेल तर तांत्रिक अडचणी येतात. अशावेळी परिस्थितीनुसार तात्पुरते किंवा कायमस्वरूपी कामे केली जातात.