शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नदी पुनरुज्जीवनासाठी सव्वाआठ कोटी

By admin | Updated: December 25, 2015 23:59 IST

अश्विन मुदगल : माण, खटाव तालुका; ‘जलयुक्त’ अंतर्गत माणगंगेवर १८ तर येरळा नदीवर १० बंधाऱ्यांची होणार उभारणी

सातारा : ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत नदी पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील माण-खटाव येथे नवीन सिमेंट नालाबांध कार्यक्रमास शासनातर्फे मान्यता देण्यात आली असून, सन २०१५-१६ या वर्षामध्ये ८ कोटी २३ लाख रुपये निधी मंजूर झाला असून, मागगंगेवर नव्या १८ सिमेंट बंधारे व रानमळा येथे ५ व येरळा नदीवर १० अशा एकूण ३३ बंधाऱ्याची उभारणी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षभरात झालेल्या कामाचा आढावा व त्याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, ‘जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत नदी, ओढा व नाल्यांमधील गाळ काढणे, सरळीकरण व खोलीकरण ही कामे लोकसहभागातून करून नदी, ओढा, नाला पुनर्जीवन करण्यास पुढाकार घेऊन लोकवर्गणी, श्रमदानाद्वारे मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे किंवा देत आहेत, अशा गावांमध्ये घेण्यात आलेल्या नदी, ओढा व नाला पुनरूज्जीवन कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी अभिसरणाच्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. दि. १७ नोव्हेंबर व ३ डिसेंबर २०१५ रोजी ग्रामविकास व जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजय शिवतारे आणि सचिव प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सादरीकरण केले होते. या सादरीकरणाच्या अनुषंगाने माण तालुक्यातील माणगंगा नदीवर १८ बंधारे, रानमळा येथे ५ व येरळा नदीवर १० अशा एकूण ३३ बंधाऱ्यास मान्यता देण्यात आली. यासाठी सन २०१५-१६ या वर्षामध्ये एकूण ८ कोटी २३ लाख निधी मंजूर झाला आहे. ‘सर्व सिमेंट नाला बांधाऱ्याची कामे मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी लघुसिंचन (जलसंधारण), जलसंपदा विभाग व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यात येतील. ही कामे मुदतीत पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याने निविदा मुदत कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे,’ असे मुदगल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महाराजस्व अभियान...२ लाख २६ हजार ५२१ खातेदारांच्या सातबारावरील इतर हक्कांतील हस्तांतरण बंदीचे शेरे उठविण्यात आले आहेत. त्यामुळे या लोकांना आपल्या जमिनी खरेदी-विक्री, विकसन करणे सोयीचे होत आहे.ज्या प्रकल्पग्रस्तांना दहा वर्षांपूर्वी जमिनीचे वाटप झाले होते. अशा २,५९४ प्रकल्पग्रस्तांनी कब्जा हक्काची रक्कम भरल्याने जमीन त्यांच्या नवीन शर्तीऐवजी जुन्याशर्तीची करण्यात आली. महाराजस्व अभियानांतर्गत १ जुलै ते आजअखेर २५८ शिबिरे घेण्यात आली असून, आॅक्टोबर २०१५ अखेर विविध प्रकारचे ८५,८३३ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहेत.अतिक्रमित रस्त्यांवरील १६६ अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. याचा २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.गौणखनिज अनधिकृत वाहतूक प्रकरणांमध्ये आजअखेर १ कोटी ९६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३६ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या वर्षात ५५० नव्या विहिरी पूर्ण, पुढील वर्षात ६०० विहिरींचे उद्दिष्ट.१ हजार विहिरींचे पुनर्भरण पूर्ण करण्यात येणार आहे.‘जलयुक्त’च्या कामावर ७९ कोटी खर्चजलयुक्त शिवार अभियानांतर्गत २१५ गावांची निवड अभियानांतर्गत ४,७१३ कामे पूर्ण तर १,३०९ कामे प्रगतिपथावर १० हजार ५७७ हेक्टरवर ट्रीटमेंटआत्तापर्यंत जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांवर ७९ कोटी खर्चअपेक्षित पाणीसाठा २४००० टीसीएम