शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राजवाडा बसस्थानकाला टाळे ठोकू

By admin | Updated: July 30, 2014 23:18 IST

परळी आढावा बैठक : गाड्यांच्या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा एसटीच्या अधिकाऱ्यांना इशारा

परळी : एसटी बसेस वेळेवर येत नाहीत यासह अनेक तक्रारींचा पाढा वाचून येथील प्रभाग आढावा बैठकीत परिसरातील ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. एसटीच्या गाड्या रद्द होणे, वेळेवर न येणे, गाड्या गळक्या असणे, अशा अनेक कारणांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राजवाडा बसस्थानकाला टाळे ठोकण्याचा इशारा एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि लवकरात लवकर कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.प्रभाग आढावा बैठकीला पंचायत समितीचे सभापती धर्मराज घोरपडे, उपसभापती विजय काळे, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समितीच्या सदस्या कविता चव्हाण, सदस्य सोमनाथ पवार, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, पोलीस निरीक्षक विष्णू पवार, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस, परळीचे सरपंच सतीश बोबडे तसेच विविध खात्यांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.बैठक सुरू होताच ग्रामस्थांनी एसटी महामंडळ, वीजवितरण कंपनी, पशुवैद्यकीय विभाग, कृषी विभाग, उरमोडी धरण विभाग, पाटबंधारे विभाग यांच्याविषयीच्या अडचणींचा पाढा वाचायला सुरुवात केली. एसटी महामंडळाने प्रत्येक बैठकीप्रमाणे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ‘प्रस्तवा पाठविले आहेत, नवीन गाड्या वाढविल्या आहेत,’ अशी उत्तरे देण्यास सुरुवात केल्यावर ग्रामस्थ संतप्त झाले. गाड्या वेळेवर येत नाहीत. अचानक रद्दसुद्धा होतात, असे सांगत ‘आम्ही राजवाडा बसस्थानकाला टाळे ठोकू,’ असा इशारा ग्रामस्थांनी एसटी महांडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘लोक बसस्थानकातून मला फोन करतात. गाड्या अचानक रद्द का होतात? राजवाडा बसस्थानक प्रवाशांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी?’कृषी विभागानेही आपल्या योजना राबविताना कृषी सहायकाकडून नव्हे तर गावचे सरपंच आणि लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन योजनेचा निधी खर्च करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. बुडित क्षेत्रात गेलेल्या दहिवड, बनघर, लुमणेखोल, वेणेखोल, पुनवडी, आरगडवाडी, रोहोट, नित्रळ, कातवडी या गावांना आरोग्य सुविधा द्याव्यात, पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे, या ग्रामस्थांना कोणत्याही अडचणी येऊ देऊ नयेत, आरोग्य उपकेंद्रामध्ये दररोज तीन ते पाच या वेळेत आरोग्यसेवक व सेविकांनी उपस्थित राहावे, वन अधिकाऱ्यांनी गावांना, शाळांना, ग्रामपंचायतींना मोफत रोपे वाटावीत, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरे दवाखान्यात येण्याची वाट न पाहता गावोगावी जाऊन लसीकरण करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. (वार्ताहर)